Monday, May 31, 2010

महाराष्ट्राचे मानबिंदू – छत्रपती शिवाजी महाराज


 

महाराष्ट्राचे मानबिंदू – छत्रपती शिवाजी महाराज

शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानतम व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व उपरोक्त परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या व कार्यकर्तृत्वाच्या प्रत्येक पैलुचा उल्लेख या कवनात केलेला आहे.
ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पीक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी, (संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती, गजानन मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स) पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. वडिलांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक) असल्यामुळे शिवबांची जडण-घडण त्यांच्या आई जिजाबाईंच्या सहवासात व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. रामायण, महाभारत या गोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झाले. या गोष्टींच्याच माध्यमातून त्यांची स्वराज्य प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीपासून मोठ्या कुशलतेने केला. त्याचबरोबर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले.
मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्या जाहगिरीचा ताबा जिजाबाईंनी घेतला. जिजाबाईंनी त्याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून, लोकांना एकत्र करून पुन्हा पुणे हे गाव वसवलं. याच काळात जाहगिरीच्या कारभाराच्या निमित्ताने शिवाजी राजांचा संबंध इथल्या १२ मावळांमध्ये आला. या ठिकाणीच त्यांना प्रथम बालमित्र व नंतर स्वराज्याचे शिलेदार मिळाले. या काळातच त्यांचे नेतृत्वगुणही फुलायला लागले. एका स्त्रीवर अत्याचार करणार्‍या एका गावाच्या पाटलाला त्यांनी हात-पाय तोडण्याची शिक्षा याच काळात सुनावली. आपल्या दक्ष न्यायव्यवस्थेचे उदाहरण रयतेसमोर ठेवले व स्वराज्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास ते समर्थ असल्याचेही सिद्ध केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी रायरेश्र्वराच्या पठारावर शिवलिंगाला स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. या वेळी सोबत त्यांचे जिवाभावाचे सवंगडी-मावळे होतेच. तोरणा जिंकून त्यांनी जणू स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले. तोरण्यानंतर पुरंदर काबीज करणे, फत्तेखानाबरोबरची लढाई यामुळे शिवरायांचा आत्मविश्र्वास व निर्धार या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. पण त्यांची खरी परीक्षा झाली ती शहाजीराजांना कैद झाली त्या वेळी! शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा उपयोग करून, दिल्लीच्या बादशाहकरवी आदिलशाहवर दबाव आणून त्यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले.
त्यानंतरच्या काळात अफझलखानाच्या रूपाने महाराष्ट्रावर खूप मोठे संकट आले. हजारो गावे खानाच्या सैन्याने जाळली, हजारो मंदिरं नष्ट केली आणि रयतेवरही खूप अन्याय केले. पण महाराजांनी न घाबरता, न डगमगता त्याचा सामना करण्याचे ठरवले. स्वराज्याचे आपण पालक आहोत ही भावना प्रबळ होत गेली. त्यातच कान्होजी जेधे व इतर अनेक सरदारांनी केलेला त्याग व पराक्रम यातून कृतज्ञतेची आणि जबाबदारीची भावना प्रबळ होत गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून इतिहासात नवा अध्याय लिहिला. 'अफझलखान चाल करून आला, त्याला महाराजांनी शिताफीने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलावले आणि धाडसाने खानाला संपवले.' – या वाक्यांमध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा, अभ्यासकांना आश्र्चर्य वाटेल असा आणि आजही मार्गदर्शक ठरेल असा मोठा इतिहास सामावलेला आहे. खानाला भेटतानाचा गणवेश, खानाचा देह (उंची, जाडी), स्वत:ची उंची, `काय झाल्यास काय करायचे' याच्या पर्यायांचा अभ्यास, सोबतीच्या माणसांची निवड, खानाचा खात्मा केल्यानंतर त्याच्या सैन्याचा पराभव करण्यासाठीचे नियोजन, त्यासाठीचा गनिमी कावा, मोहीम अयशस्वी झाली अन्‌ खुद्द शिवरायांना दगाफटका झाला तर पुढे काय करायचे याचे पूर्ण नियोजन – या सर्व घटकांचा तपशीलवार विचार महाराजांनी त्या प्रसंगी करून ठेवला होता. शाहिस्तेखानाची पुण्यात लाल महालात कापलेली बोटे, पुढील काळात आग्र्याहून केलेली सुटका हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगही छत्रपती शिवरायांच्या गुणांची साक्ष देतात.
स्वराज्याची सीमा दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत तर उत्तरेत सातपुड्यापर्यंत त्यांनी नेली होती. लढाईच्या काळात त्यांनी कधी रयतेला त्रास दिला नाही, की मराठी सैन्याने कुणाच्या स्त्रियांवर अत्याचार केला नाही. स्वत:च्या सैन्यासमोर त्यांनी आदर्श ध्येयवाद, नीतिमूल्ये व स्वराज्यनिष्ठा ठेवल्यामुळे मराठी सैन्यामध्ये सदैव आवेग, आवेश आणि उत्साहाचे वातावरण असायचे!
स्वराज्यनिष्ठा व पराक्रम यांसह सैन्य उभे करणे, विविध आक्रमणांना तोंड देणे, लढाया यशस्वी करत गडकोट काबीज करणे हे करत असतानाच, दुसर्‍या बाजूला शिवरायांची प्रशासनात्मक व रचनात्मक कामेही चालूच असत. शिवाजीराजांनी एक आदर्श शासनव्यवस्था उभी केली. सैन्याचा पगार केंद्रीय पद्धतीने देणे, सरदारांच्या बदल्या करणे, शेती व शेतसार्‍याबद्दल यंत्रणा लावणे, भूक्षेत्रानूसार शेतसारा निश्र्चित करणे, नैसर्गिक आपत्तींच्या काळात प्रसंगी शेतसारा माफ करणे अशा अनेक महत्त्वाच्या व्यवस्था त्या काळात सुरू झाल्या. ६ महिने स्वराज्याच्या सैन्यात नोकरी व ६ महिने शेती करणे ही शिलेदारी व्यवस्था सुरू करून महाराजांनी प्रजेला २ वेळची भाकरी मिळवण्याची आणि देशसेवा करण्याची संधी एकत्रितपणे दिली. त्यामुळे प्रजेला आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली, तसेच स्वराज्याबद्दलची प्रजेची निष्ठा अधिकाधिक घट्ट होत गेली.
सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, … यांसारख्या हजारो मावळ्यांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यामागे फार मोठा ध्येयवाद होता, राष्ट्रवाद होता. आधुनिक शस्त्रास्त्रे, वेगवान घोडदळाचा विकास व कोकण किनारपट्टीकडून अरब, हपशी, सिद्धी, पोर्तुगीज यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेली आरमाराची स्थापना या महत्त्वाच्या घटकांचेही त्यामध्ये योगदान होते. शत्रूचे मर्म आणि मर्यादा ओळखून त्यावर अचानकपणे हल्ला करून, वार्‍याच्या वेगाने चाल करून शत्रूची दाणादाण उडवून देण्याच्या अनोख्या तंत्रामुळे त्यांनी दिलेरखान, शाहिस्तेखान, अफझलखान व इतर अनेक सरदारांची पळताभुई थोडी केली .स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक आक्रमणापासून त्यांनी प्रजेचे रक्षण केले.
जगद्‌गुरू संत तुकाराम, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही तीन अलौकिक व्यक्तिमत्त्वे एकाच काळात महाराष्ट्रात वास्तव्यास होती. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळच! संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांच्या भेटीचे उल्लेख इतिहासात आढळतात. (काही अभ्यासक या दोहोंची भेट १६४७ साली झाल्याचे सांगतात, तर काही अभ्यासक १६४९ मध्ये ही भेट झाल्याचा अंदाज व्यक्त करतात.) संत तुकारामांचे कीर्तन ऐकून मूळातच सत्‌प्रवृत्तीचे व आध्यात्मिक वृत्तीचे असणारे छत्रपती यांच्या मनात विरक्तीचे विचार प्रबळ झाले. पण संत तुकोबारायांनी छत्रपतींना `आम्ही जगाला उपदेश करावा। आपण क्षात्रधर्म सांभाळावा' असा उपदेश केला. शिवरायांनी या आज्ञेचे पुढील काळात तंतोतंत पालन केले.
स्वराज्य खूप मोठे झाले होते. अशा वेळेसच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या पुनरुत्थानाचे बीजच ठरले. १६७४ सालच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांकडून झाला. महाराज छत्रपती झाले. हा महाराष्ट्राच्या व भारताच्याही इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रमाचा, आनंदाचा व अभिमानाचा क्षण होय!
छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा… असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी
- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,
- पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला,
- साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला,
- स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;
- महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले,
- योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला,
- आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;
- सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली;
- राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला.
- तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.
या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात!
सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते.
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आले. याच काळात त्यांच्या तब्बेतीवरही फार परिणाम झाला. सततच्या मोहिमा, दगदग यामुळेच त्यांना ज्वराचा त्रास वाढतच गेला. यातच दि. ०३ एप्रिल, १६८० रोजी त्यांचा मृत्यू झाला. एका विशाल पर्वाचा अंत झाला.
मानवी देहाच्या मर्यादेत राहून शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती आणि इच्छाशक्ती यांच्या क्षमतेच्या योग्य वापराची अंतिम मर्यादा गाठून शौर्य, शील, नीतीमत्ता, दूरदृष्टी, धाडस, प्रसंगावधान यासारख्या अनेक सद्गुणांचा सर्वकालीन श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे शिवराय हे मनुष्याच्या अंगभूत शक्ती जाग्या होऊन योग्य कार्यात वापरल्या गेल्या तर काय चमत्कार घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अलौकिक यश कसे मिळवावे हे शिकविणारा हा महाराष्ट्राचा देव महाराष्टीय लोकांच्या मनात अढळ आणि अमर झाला आहे.
शिवचरित्र हे महाराजांच्या मृत्यूपर्यंत थांबत नाही. पुढच्या काळात तब्बल ३० वर्षे या महाराष्ट्राला स्थिर व एकमेव असे नेतृत्व नसतानाही, स्वत: औरंगजेब महाराष्ट्रात आला असतानाही हे स्वराज्य समर्थपणे त्याच्याशी लढले व मुघल सम्राटाला इथेच, याच भूमीत प्राण ठेवावे लागले.
शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे 'आंनदवनभुवन' च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहे. हे काव्य म्हणजेच छत्रपतींनी पार पाडलेले 'इतिकर्तव्य' होय.


Sunday, May 30, 2010

Men that became women



 


men that became women01

men that became women02

men that became women03

men that became women04

men that became women05

men that became women06

men that became women07

men that became women08

men that became women09

men that became women10

men that became women11

men that became women12

men that became women13

 

men that became women15





Love Never Dies



Love Never Dies

 

 When Nazi did the holocaust in Germany by burying alive the Jews, there also spread a story of undying love.

 

 A mother and her daughter happened to be captured as well, soon to be buried alive together along with the other thousands of Jews. The little girl did not understand and had no idea at all what was going to happen to her and her mother. She just kept playing and singing out her innocent heart.

 

 After being tired of playing around, the little girl returned back to the camp. She was not able to find her mother any longer. In her innocent world, she still have not understand yet what was death, even more of what dying a horrible tragic death was. She waited and waited, when is her dear mother going to come back. In her wait, she had persistent faith that mom would surely returned, so that she would be able to hear again her lullaby.

 

 The next day was supposed to be her turn. She faced all that fully with her innocent heart till she reach the hole of where she was going to be buried. When she was about to be dragged to the hole, her soft voice said to the muscular soldier in charge, "Mister, please don't put me in too deep ok, just put me in near the surface, so that when mommy comes, she will still see me waiting for her here."

 

 Love is undying. Violence, brutality can only bury and destroy the body, but it cannot towards love. Love never dies.

 

On-screen Bollywood's odd couples

On-screen Bollywood's odd couples

Saturday, May 29, 2010

जलसाक्षरतेची गरज!

जलसाक्षरतेची गरज!


दरवेळेस पावसाळ्यानंतर प्रश्न भेडसावतो तो पाण्याचा! पाण्यावरून संघर्ष पेटतात, आंदोलने होतात, शासनप्रणालीला दोषही दिला जातो, पण प्रत्येक माणूस स्वत:ची जबाबदारी मात्र विसरतो. अगदी शेतकऱ्यांचे उदाहरण घेतले तरी आपल्या शेतीच्या वरकस भागातल्या एखाद्या शेतात 'शेततळे' करणे सहज शक्य आहे.

...................

'
भारतीय शेती हा मान्सूनचा जुगार आहे', असे म्हटले जाते. मात्र साराच दोष आपण मान्सूनला देता कामा नये. काहीही झाले तरी मान्सून आपली सरासरी गाठण्याचा प्रयत्न करतोच. काही ठिकाणी तो सरासरी ओलांडून पलीकडे जातो, काही ठिकाणी तो सरासरीपर्यंत येतो तर काही ठिकाणी तो सरासरीला सपशेल 'पाठ' दाखवितो. या 'पाठी'ची कारणे काहीही असोत, ग्लोबल वॉमिर्ंग असो, जागतिक हवामान बदल असो वा बेसुमार जंगलतोड असो, बदल, उत्क्रांती क्रमविकसन हा नैसगिर्क धर्म मानला जातो ना? निसर्गच निसर्गाचे क्रम-विकसन करतो ना? परंतु असे असले तरीसुद्धा त्यावर उपाय आपण शोधायलाच हवा. जलसाठ्यात होणाऱ्या कमरतरतेचा गांभीर्याने विचार करून हे आव्हान आपण स्वीकारायला हवे!

या वषीर्च्या पावसाळ्यातील दुष्काळी स्थितीमुळे देशाच्या बहुतांश भागांना, राज्यांना दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागला. आपला भाग 'दुष्काळी भाग' म्हणून जाहीर होण्यासाठी, केंदीय मदतीसाठी चढाओढ सुरू झाली. प्रसंगी राजकारणालाही रंग-ढंग दिले गेले, मात्र कायमस्वरूपी उपायांची वानवाच दिसून आली. दुष्काळातून मोठ्या प्रयत्नाने वाचविलेली उर्वरित शेती देखील नंतर आलेल्या पावसाने पार कुजून गेली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची दखल शासन यंत्रणेनेे घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढावयास हवा! शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासाठी आथिर्क मदतीबरोबरच बी-बियाणे, खते, औषधे, सवलतीच्या दराने शेती अवजारे पुरवून प्रोत्साहन देणो जरूरीचे आहे. शेतकऱ्यांचे खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बीच्या हंगामात भरून काढून त्यांची मानसिकता घडवायला हवी!

दरवेळेस पावसाळ्यानंतर प्रश्न भेडसावतो तो पाण्याचा! पाण्यावरून संघर्ष पेटतात, आंदोलने होतात, शासनप्रणालीला दोषही दिला जातो, पण प्रत्येक माणूस स्वत:ची जबाबदारी मात्र विसरतो. अगदी शेतकऱ्यांचे उदाहरण घेतले तरी आपल्या शेतीच्या वरकस भागातल्या एखाद्या शेतात 'शेततळे' करणे सहज शक्य आहे, जेणेकरून पावसाने ओढ लावण्यास वा दुष्काळी स्थिती भासल्यास या साठवलेल्या पाण्याचा उपयोग करून उर्वरित शेती वाचविणे शक्य होईल. पण याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. 'झालेच नुकसान तर मिळेल आपल्याला सरकारी मदत' ही भावना यामागे असू शकेल?

स्वातंत्र्योत्तर काळापासूनच नदीजोड प्रकल्पाचा आराखडा आखण्यात आला, घोषणाही करण्यात आली, त्यावर एक समितीही नेमली गेली, पण प्रत्यक्षात हा नदीजोड प्रकल्प कार्यान्वित झालाच नाही! या नदीजोड प्रकल्पाला विकासाची खरी 'आस' होती की काही खास स्वरूपाचे यात 'राज' होते हा संशोेधनाचाच विषय ठरेल!

नदीजोड प्रकल्प हा पाणी टंचाईवरील उत्तम उपाय आहे, असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी त्यात बऱ्याचशा संभाव्य धोक्यांचाही विचार करावा लागेल. पाणी हा जलपदार्थ नेहमी समपातळीत राहत असल्याने प्रथम उंचसखल भागांचा विचार नदीजोड प्रकल्प राबविताना करावा लागेल. हा प्रकल्प राबविताना धरणांनी पाणी अडविले गेले, तरी पूरपरिस्थिती उद्भवल्यास नदीजोड प्रकल्पासाठी काढलेल्या कालव्यातून प्रचंड पाण्याचे लोंढे नियंत्रणा-पलीकडे जाण्याचा धोका आहे. एकाच भागात पाण्याचे सारखे लोंढे आल्यास सर्वत्र हाहाकार माजण्याची शक्यता आहे. शेतीसाठी विशिष्ट भागासाठी आणले गेलेले हे पाणी सारी शेती वा विभागच वाहून नेईल. यासाठी तज्ज्ञामार्फत अगदी सावधपणे हा नदीजोड प्रकलप राबवावा लागेल. सतत डोळ्यात तेल घालून संभाव्य धोके आपणास टाळावे लागतील.

या नदीजोड प्रकल्पाचा फायदा वरकरणी वाटला तरी राज्या-राज्यातील जल-व्यवस्थापनाचे प्रश्न आपण कसे सोडविणार आहोत? 'कावेरी'चे उदाहरण तर अगदी ताजे आहे. म्हणजे पुन्हा गंगा ते कावेरीमध्ये येणाऱ्या राज्यांमध्ये पाणी संघर्ष पेटणार नाही, हे कशावरून? तसेच अन्य नद्यांच्या जोडणीतूनही हे प्रश्न निर्माण होणारच आहेत. म्हणूनच यासाठी प्रत्येक राज्या-राज्याने आपापल्या भागात पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त वेगवेगळे प्रकल्प राबवून साठविले, जिरवले तर पाण्याचे व्यवस्थापन करणे शक्य होईल. यासाठी अगदी 'रेनहावेर्स्टिंग'पासूनच सुरुवात हवी! नदी, नाले, ओढे, कालवे यातून वाहून जाणारे पाणी अडवून ते जागोजागी जमिनीत मुरवले, जिरवले, तर जमिनीखालील जलसाठ्यांत वाढ होणार नाही का? अगदी विहिरी, तळी, डोह, डबकी, सरोवरे तसेच चर, खंदक, वरंबे जागोजागी खणून त्यामधून पाणी जिरवावयास हवे, म्हणजे उन्हाळ्यात या जमिनीखालच्या पाण्याचा उपसा करणे सहज शक्य होईल.

जबाबदारीची जाणीव, भावना आज समाजातून जवळजवळ नष्ट होत चालली आहे. यासाठी जनजागृती करून जलसाक्षरतेची मोहीमच साऱ्या देशभर राबविली गेली तर हा एक उत्तम उपाय होऊ शकेल. जल व्यवस्थापनेला याचे बहुमोल साहाय्य होऊ शकेल, मात्र यास प्रतिसाद लाभल्यास पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी, पाणीचोरीला आळा घालण्यासाठी काही 'जालीम उपाय' करणे ही देखील काळाची गरज आहे. त्यासाठी 'कटुता' आली तरी बेहत्तर!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकसंख्या नियंत्रण अमलात आणले गेले असते तर या देशाची भरभराट झाल्यावाचून राहिली नसती. आज विपुल प्रमाणात नैसगिर्क साधनसामग्री असूनही अफाट वाढलेल्या लोकसंख्येमुळे तिचा विनियोग योग्यप्रकारे आपणास करता येत नाही.

देशाने विकासाची आस धरून संशोधनाच्या, प्रगतीच्या वाटा पादाक्रांत केल्या, परंतु आड आली ती दारिद्यरेषेखालील नागरिकांची वाढती लोकसंख्या! यासाठी आपले सरकार कार्यरत आहे, परंतु या लोकांसाठी कार्यान्वित केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत! आपल्या अर्थव्यवस्थेची चाके खुल्या, मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने रुळावर येऊ पाहत आहेत, परंतु त्यातही काहीसे डगमगते, डळमळते धोरण दिसत आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताच्या 'पाचवीला' पूजलेली ही गरिबी हटविणे आजही आपणास शक्य होत नाही, हीच दुदैर्वाची बाब म्हणावी लागेल.

नैसगिर्क साधनसंपत्तीचा विनियोग असो, लोकसंख्येचे नियोजन असो, शेती व्यवस्थापन असो वा पाण्याचे नियोजन असो भारताला महासत्ता बनविण्याच्या कामी लोकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. हे सहकार्य कायद्यात वारंवार बदल करून वा बंदुकीचा धाक दाखवून प्राप्त होणार नाही, तर त्यासाठी जनजागृती, जनसाक्षरता, दारिद्यनिर्मूलनाची मोहीम साऱ्या देशपातळीवर हाती घ्यावी लागेल.

समरसता हाच मूल स्वर

समरसता हाच मूल स्वर

मुंबईतील शिवाजी पार्क येथे दि. ११ डिसेंबर २००५ रोजी झालेल्या बौध्दिक वर्गातील मा. सुदर्शनजींचे भाषण

''डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली संघ सुरू केला आणि व्यक्तिगत संपर्काच्या कार्यपध्दतीचा अवलंब केला. या कार्यपध्दतीवर बाह्य प्रचारतंत्राचा काहीही परिणाम होत नाही. आज काही विदेशी शक्ती आणि विदेशप्रेरित शक्ती संघाबद्दल अपप्रचार करीत असतात, परंतु या अपप्रचाराचा आजही फारसा विपरीत परिणाम होत नाही. हिंदू समाज संघटित होऊ शकतो यावर डॉक्टरांच्या काळी कुणाचा विश्वास नव्हता. जाती, पाती, पंथ, भाषा यांत विखुरला गेलेला समाज संघटित होईल असे कुणाला वाटत नव्हते, परंतु ध्येयवेडया माणसांनीच जगात मोठमोठी कार्ये करून दाखविली आहेत.
आज संघकार्याला ऐंशी वर्षे झालेली आहेत. आज संघकामात पाचवी पिढी आहे. आज येथे १९३४ साली स्वयंसेवक झालेले विनायकराव वालावलकर आहेत आणि नुकतेच संघात आलेले १३-१४ वर्षांचे किशोरवयीन स्वयंसेवकसुध्दा आहेत. त्यामुळे संघात तरुण पिढी येत नाही हा समज चुकीचा आहे हे सिध्द होते. डॉक्टरांनी जेव्हा संघ सुरू केला तेव्हा संघात फक्त तरुणच होते, परंतु संघाचे वय जसजसे वाढत चालले तसतसे तरुण पिढी आणि जुणी पिढी यांचे प्रमाणही वाढत चालले आहे आणि ते स्वाभाविकसुध्दा आहे.

संघाच्या ऐंशी वर्षांच्या काळात प्रत्येक पिढीचे योगदान आहे. १९२५ ते १९४५ या कालावधीत संघाच्या पहिल्या पिढीने रक्ताचे पाणी करून हे सिध्द केले की जाती, पाती, पंथ, भाषा या भेदांचा पलीकडे जाऊन हिंदू समाज संघटित होऊ शकतो. १९४० साली डॉक्टर खूप आजारी होते. हे आपले जिवावरचे दुखणे आहे हे ओळखून ते श्रीगुरुजींना म्हणाले, ''हे कार्य येथून पुढे आपल्याला चालवायचे आहे.'' २१ जून १९४० ला सकाळी .२५ ला डॉक्टरांनी शेवटचा श्वास घेतला. डॉक्टरांच्या अंतिम इच्छेप्रमाणे श्रीगुरुजी सरसंघचालक झाले.

आपल्या पहिल्या भाषणात श्रीगुरुजी म्हणाले, ''मतभेदांच्या कोलाहलात बुडणारी लेचीपेची संघटना डॉक्टरजींनी आपल्या स्वाधीन केलेली नाही. आपली संघटना म्हणजे अभेद्य किल्ला आहे. या किल्ल्यांच्या भिंतीवर चंचुप्रहार करणार्यांच्या चोची तुटून पडतील अशी कडेकोट बांधणी डॉक्टरांनी केली आहे.'' २१ जुलैला मासिक श्राध्दाच्या वेळी बोलताना गुरुजींनी सांगितले की, डॉक्टरजींच्या नंतरसुध्दा सर्व स्वयंसेवक पूर्वीप्रमाणेच कार्य करीत आहेत. यावरून हीच गोष्ट सिध्द होते की, डॉक्टरांनी आम्हाला रूढीवादी बनविलेले नाही. आम्हाला तत्त्वनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा याचीच शिकवण दिलेली आहे.

पहिल्या पिढीची शेवटची पाच वर्षे राष्ट्रजीवनात उलथापालथ करणारी होती. १९४० साली महंमदअली जीना यांनी पाकिस्तानची घोषणा केली. १९४२ साली महात्मा गांधींनी 'छोडो भारत' आंदोलन सरू केले. या आंदोलनात आपण भाग घेतला पाहिजे अशी अनेक प्रचारकांच्या मनात इच्छा झाली. अनेक प्रचारकांच्या मनातही हा विचार होता. सर्व प्रचारकांच्या वतीने दत्तोपंत ठेंगडींनी श्रीगुरुजींशी चर्चा केली. श्रीगुरुजी म्हणाले, ''आमचा पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांची रक्षा हिंदू समाज संघटन करून हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय संघाचा घटक बनलेलो आहे असे आपण आपल्या प्रतिज्ञेत म्हणत असतो. त्यामुळे देशाला स्वतंत्र करण्यासाठी चालविल्या जाणार्या चळवळीत भाग घेण्याची इच्छा स्वयंसेवकांना होणे स्वाभाविक आहे, परंतु या चळवळीत काही दोष निर्माण झालेले आहेत. ही चळवळ सुरू करणार्यांनी ती सुरू करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्या अन्य सर्व संघटनांशी कोणताच संपर्क केलेला नाही. असं संपर्क करून या प्रकारचे देशव्यापी आंदोलन चालविण्यासाठी प्रत्येकाला त्याच्या रुचीनुसार आणि क्षमतेनुसार काम वाटून देण्याचा प्रयत्नही झालेला नाही. त्यांनी केवळ ठराव संमत केला इंग्रजांनी सर्व नेत्यांना तुरुंगात डांबले. त्यामुळे हे आंदोलन नेतृत्वहीन झाले. आम्हाला विचारले नाही यामुळे हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनविण्याची काही गरज नाही, परंतु आजमितीस आमचे काम केवळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशापुरतेच मर्यादित आहे. अन्य प्रांतात फक्त दोन-चार ठिकाणीच शाखा आहेत. येथील कार्य पाहून लोकांना वाटते की, संघकार्य खूप मोठे आहे. आपण आंदोलनात भाग घेतला पाहिजे, परंतु मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र देशाच्या मध्यभागी आहोत. त्यामुळे दोन्हीकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. ब्रिटिश सरकारने असे काही केले आंदोलन असफल झाले तर लोकांमध्ये नैराश्याची भावना बळावेल. म्हणून संघ यात भाग घेणार नाही, परंतु वैयक्तिक रूपाने संघस्वयंसेवक यांत भाग घेऊ शकतात, असे गुरुजी म्हणाले.

इंग्रजांनी काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यामुळे आंदोलन नेतृत्वहीन झाले होते. अशा वेळी अनेक भूमिगत नेत्यांना स्वयंसेवकांनी आश्रय दिला. अरुणा असफअली या दिल्लीचे संघचालक लाला हंसराज यांच्या घरी १५ दिवस होत्या. साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन आदींनासुध्दा स्वयंसेवकांनी आपल्या घरात आश्रय दिला.

१९४५ नंतर संघाच्या दुसर्या पिढीचे कार्य सुरू झाले. १९४६ साली मुस्लिम लीगने 'डायरेक्ट ऍक्शन'ची घोषणा करून ठिकठिकाणी दंगे पेटविले. या दंग्यात अनेक ठिकाणी हिंदू कापले गेले. ज्या ज्या ठिकाणी शाखा सुदृढ होत्या त्या त्या ठिकाणी हिंदूंचे रक्षण करण्याचे कर्तव्य स्वयंसेवकांनी पार पाडले, तर ज्या प्रांतात लीगचे शासन होते तेथे पोलीस आणि सैन्य दंगेखोरांचे रक्षण करीत. हिंदू आयाबहिणींनी त्या काळी अतुलनीय बलिदान केले.

मुस्लिम दंग्यांचा परिणाम होऊन १९४७ साली देशाची फाळणी झाली. महात्मा गांधी म्हणायचे - माझ्या देहाचे तुकडे होतील, पण देशाची फाळणी होणार नाही. पंडित नेहरू म्हणायचे - पाकिस्तानची मागणी फँटॅस्टिक नॉन्सेन्स आहे. परंतु मुस्लिम दंग्यांपुढे शरणागती स्वीकारून देशाच फाळणी ही स्वीकारली गेली. या काळात स्वयंसेवकांनी आणखी एक मोठे कार्य केले. संसदेला उडवून देण्याची योजना मुस्लिम लीगने आखली होती. स्वयंसेवकांनी मुसलमानांसारखे वेषांतर करून लीगच्या कार्यालयातून ही कागदपत्रे मिळवली आणि ती सरदार पटेल यांना नेऊन दिली. सरदार पटेल यांनी या माहितीच्या आधारे ठिकठिकाणी छापे मारून दिल्ली वाचवली.

श्रीगुरुजींनी फाळणीच्या विरोधात प्रचार सुरू ठेवला होता. तेव्हा संघ आणि काँग्रेस एकत्र आले असते तर कदाचित फाळणी टाळता आली असती, परंतु लॉर्ड माऊंटबॅटन यांनी धूर्तपणे फाळणीची योजना पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या गळी उतरवली. गांधीजींच्या लक्षात आले की जनमत आपल्या विरोधात आहे.
त्यावेळी संघाने फाळणीला विरोध केला असत तर लोक म्हणाले असते, ''खंडित का होईना परंतु स्वातंत्र्य मिळाले आहे आणि संघ मात्र याचा विरोध करीत आहे. ही फाळणी थोडीच टिकणार आहे. काही दिवसांनी सर्व एक होईलच. संघवाल्यांनी उगीच विरोध कशाला करावा?'' तयावेळचय प्रचारतंत्रामुळे 'संघ फाळणीच्या विरोधात आहे, संघ स्वातंत्र्याच्या विरोधात नाही.' ही गोष्ट लोकांपर्यंत मुळीच पोहोचली नसती, म्हणून फाळणी चुकीची आहे हे जाणूनसुध्दा संघाने सार्वजनिक रूपाने व्यापक पातळीवर तिला विरोध केला नाही. इंग्रजांना माहित होते की संघ आणि काँग्रेस या दोन्ही हिंदुत्वशक्ती आहेत. यांची आपापसांत साठमारी होऊन हिंदुत्व नष्ट झाले की आपोआप भारतावर आपला कब्जा ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. यामुळे गुरुजींनी अंतर्गत कलह टाळला.

श्रीगुरुजींनी फाळणीची मीमांसा करताना म्हटले की, हिंदूंचे विघटन आणि दुर्बलता यामुळे फाळणी झाली आहे. ही कारणे दूर केली तर देश पुन्हा अखंड होईल. फाळणीने विस्थापित झालेल्या आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी पंजाब सहायता समिती आणि वास्तुहारा सहायता समिती गठित करण्यात आली. यावेळी १९ जानेवारी १९४८ ला श्रीगुरुजींनी मुंबईतील एका सभेत 'वयं पंचाधिकं शतम्' हे अजरामर भाषण केले. श्रीगुरुजी म्हणाले, ''आपण आपापसात लढू नये, पण पाकस्तानच्या विरोधात लढताना आपण एकशेपाच आहोत याचे भान ठेवावे.''

या कालखंडात श्रीगुरुजींच्या विराट सभा होत होत्या. त्यामुळे नेहरूंच्या मनात श्रीगुरुजींविषयी ईर्ष्या निर्माण झाली. ते संघावर बंदी घालण्याची भाषा करू लागले. २९ जानेवारी १९४८ रोजी अमृतसरला ते म्हणाले, ''जातीयवादी शक्तींचा (संघाचा) आम्ही नायनाट करू.'' ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा गुरुजी चेन्नईत होते. आपला प्रवास रद्द करून ते नागपूरला परतले. तेथे त्यांना ३०२, ३०५, ३०७ कलमे लावून अटक करण्यात आली. पुढे ही कलमे काढण्यात आली. फेब्रुवारी १९४८ रोजी संघावर बंदी घालून हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. गांधीजींच्या हत्येत संघाचा हात नसल्यामुळे अन्याय निवारणार्थ सत्याग्रह करण्यात आला. शेवटी सरकार नमले संघबंदी उठविण्यात आली.

वर्षातून दोनदा श्रीगुरुजींनी संपूर्ण देशभर प्रवास केला. जून १९७३ ला त्यांचे निधन झाले. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. या जन्मशताब्दी वर्षाच्या सर्व कार्यक्रमाचा मूळ स्वर आहे 'सामाजिक समरसता.' संघाच्या प्रारंभापासूनच हिंदू-हिंदूंत आपण कोणताही भेदभाव केलेला नाही. १९३४ साली वर्धा येथील संघ शिबिराला महात्मा गांधी यांनी भेट दिली. शिबिरात स्पृश्य-अस्पृश्य असे सर्व हिंदू जातिभेद विसरून एकत्र भोजनादी कार्यक्रम करताना पाहून ते म्हणाले, ''जे काम इतक्या वर्षांपासून आम्ही करीत आहोत ते संघाने अतिशय साध्या सोप्या पध्दतीने केलेले आहे.''
अशाच प्रकारे पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शिबिरात भोजनाच्या वेळी आले असताना डॉक्टरांनी त्यांना सर्वांसोबत भोजन करण्याचा आग्रह केला. त्यामुळे संघात अस्पृश्यतेला मुळीच स्थान नाही अशी त्यांची खात्री पटली. एकदा संघ शिक्षा वर्गात एक सफाई कर्मचारी असलेला स्वयंसेवक भोजनाच्या वेळी कोपर्यात संकोचून उभा होता. त्यावेळी गुरुजींनी त्याच्या मनातील भाव ओळखून त्याला सांगितले की, ''आपण सर्व सारखे आहोत. तेव्हा आधी तू मला वाढ सर्वांनाही वाढप कर.''

संघात जरी भेदभाव पाळला जात नाही तरी समाजात मात्र तो पाळला जातो. अस्पृश्यतेची भावना लोकांच्या मनातून काढून टाकण्यासाठी आपण हिंदू धर्माचार्यांची मदत घेतली पाहिजे असे श्रीगुरुजींना वाटले.

भारतातून वेस्ट इंडिजला गेलेल्या मजुरांनी रामायणाच्या आधारावर आपले हिंदुत्व टिकवून ठेवले होते. त्यांना धार्मिक विधीसाठी इंग्रजी जाणणार्या पुरोहिताची गरज होती, परंतु सेक्युलरवादाचे कारण सांगून भारत सरकारने त्यासाठी नकार दिला. तेव्हा तेथील पंडित शंभूनाथजींनी श्रीगुरुजींची भेट घेतली होती. गुरुजींनी विचार केला की विदेशात राहणार्या हिंदूंच्या गरजांची पूर्तता करायला हवी. तसेच आपल्या देशात झोपडपट्टयांतून राहणार्या अनुसूचित जाती-जमातींच्या बांधवांना संस्कार प्रदान करण्याची गरज आहे. वनांचलात राहणार्या अनुसूचित जनजातीच्या बांधवांनाही समाजाबरोबर समरस करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. १९६४ साली स्वामी चिन्मयानंदांच्या सांदिपनी आश्रमात श्रीगुरुजींनी शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य आदी सर्व धर्माचार्य जैन, बौध्द, शीख संप्रदायाच्या प्रमुखांना एकत्र बोलविले. संपूर्ण हिंदू समाजाचा विचार करून या सर्वांना एकत्र आणण्यासाठी एका समान व्यासपीठाची निर्मिती करण्याचे ठरले विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली.

१९६६ साली प्रयागला कुंभमेळयाच्या वेळी विश्व हिंदू परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनात सर्व धर्माचार्यांनी एकमुखाने घोषणा केली - 'हिन्दवा सोदरा सर्वे:' म्हणजे सर्व हिंदू बंधू आहेत. पुढे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी श्रीगुरुजी सर्व धर्माचार्यांसोबत संपर्क साधून विचारविनिमय करत राहिले. त्यानंतर उड्डुपीत झालेल्या संमेलनास १३५ धर्माचार्य व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी घोषणा केली की, 'अस्पृश्यता मानणे हे धर्मविरोधी कृत्य आहे. आमच्या मूळ धर्मग्रंथात - वेदात कोठेही अस्पृश्यतेचे समर्थन केलेले नाही.' या संमेलनात ' हिंदू पतितो भवेत्' (कुणीही हिंदू पतित होऊ शकत नाही.) हा ठराव संमत झाल्यावर श्रीगुरुजी अतिशय हर्षभरित झाले. ते जेव्हा व्यासपीठावरून खाली उतरले तेव्हा सभेचे अध्यक्ष असलेल्या भरनैयांनी त्यांना आनंदाने मिठी मारली. भरनैया हे अनुसूचित जातीचे होते, परंतु संमेलनात त्यांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव दृष्टीस पडला नाही अनुभवाला आला नाही. म्हणून ते गुरुजींना म्हणाले, ''तुम्ही आम्हाला वाचविलेत.'' तेव्हा गुरुजी म्हणाले की, ''संपूर्ण हिंदू समाज आपल्या पाठीशी उभा आहे!''

मध्व संप्रदायाचे स्वामी विश्वेशतीर्थ यांनी सफाई कर्मचार्यांच्या वस्तीत जाण्याचे ठरविल्यानंतर संप्रदायाच्या प्रतिनिधी मंडळाने या गोष्टीस हरकत घेतली. ''एखाद्या अस्पृश्याचा स्पर्श झाला असता सचैल स्नान करावे असे शास्त्रात लिहिले असतानाही तुम्ही त्यांच्या वस्तीत का जाता?'' त्यावेळी स्वामीजींनी असे सडेतोड उत्तर दिले की, ''यवनाचा स्पर्श आपल्या शरीरास झाल्यास तो भाग कापून टाकावा असेही शास्त्रात लिहिले आहे. त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही ख्रिश्चन मुसलमानांशी बरोबरीचा व्यवहार करता आणि आपल्याच बांधवांना अस्पृश्य मानून दूर कसे लोटता?'' स्वामीजी त्या वस्तीत गेल्यावर बांधवांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य अनुसूचित जातीच्या बांधवांच्या गावाजवळून जात असताना त्या लोकांनी त्यांना आपल्या वस्तीत येण्याची विनंती केली. शंकराचार्य गावात आल्यावर त्यांचे प्रेमाने स्वागत करून आम्हाला एखादी कथा सांगा, असा गावकर्यांनी आग्रह केला. तेथील लोकांची अत्यंत हलाखीची स्थिती असून त्यांनी धनदौलत वा कपडालत्ता देण्याचा नव्हे तर कथा सांगण्याचा आग्रह धरावा हे विशेष. शंकराचार्यांनी रामायणातील कथा सांगून त्यांचे मनोरथ पूर्ण केले. गुजरातमध्ये सौराष्ट्र प्रांतात दुष्काळ पडला असताना तेथील संघकार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांना पाठविण्यासाठी सुखडीचे संकलन सुरू केले. तेथील संकलन केंद्रावर एक वृध्द भिकारीण आली. कार्यकर्त्यांना वाटले की ती सुखडी मागण्यासाठी आली आहे. मात्र मिळालेल्या भिक्षेतून तयार केलेले सुखडीचे दोन तुकडे दुष्काळग्रस्तांना पाठविण्याकरिता देण्यासाठी ती आलेली होती. गावोगावी चालणार्या कथा कीर्तनातून आणि प्रवचनातून असे जनमानस या देशात घडलेले आहे. तेथे सांस्कृतिक विकास साधलेला आहे. तेथील सामन्य व्यक्तीही असामान्य अंत:करणाची धनी आहे. असे पाश्चिमात्य देशात आढळत नाही. अमेरिकेवर कॅटरिनाचे संकट आले तेव्हा न्यू ऑर्लियन्सला पंचवीस हजार निग्रो अन्नपाण्यावाचून तडफडत असताना राष्ट्राध्यक्ष बुश सुट्टीचा आनंद लुटत होते. पाश्चिमात्यांनी केवळ शरीर, मन आणि बुध्दी या तीनच गोष्टी स्वीकारल्या आहेत. त्यांनी आत्मतत्त्व जाणून घेतलेले नाही. प्रत्येकाचे शरीर, मन बुध्दी वेगवेगळी असल्यामुळे या तीन गोष्टी समाजाला जोडू शकत नाहीत. वर्चस्व हाच पाश्चिमात्य सभ्यतेचा मूळ स्वर आहे. संपूर्ण जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सामाजिक, आर्थिक राजकीय क्षेत्रांत आपलेच वर्चस्व असावे असे त्यांना वाटते. तेथील धर्मपंथांचीही हीच गत आहे. ख्रिश्चनांना वाटते की संपूर्ण जगाचे ख्रिस्तीकरण झाले पाहिजे. टेक्सासमधील डल्लास येथील संमेलनात ७१ देशांतून ७२ चर्चचे प्रतिनिधी आले होते. त्यांना आपापसातील वितुष्ट संपवून संपूर्ण जगाच्या ख्रिस्तीकरणासाठी प्रयत्नरत होण्याचे आवाहन उद्घाटकाने केले. दुसरीकडे कट्टरपंथीय इस्लामी लोकसुध्दा संपूर्ण जगाला मुस्लिम बनविण्यासाठी जिहादच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.

या सर्व आसुरी शक्तींना पराजित करण्यासाठी दैवी शक्तीची आवश्यकता आहे. इंद्रियांच्या पलीकडे मन असते, मनाच्या पलीकडे बुध्दी आणि बुध्दीच्या पलीकडे आत्मतत्त्व असते. या आत्मतत्त्वाचा साक्षात्कार भारतीयांना झालेला आहे. या तत्त्वज्ञानाच्या आधारावर संपूर्ण जगाला एकतेचा आणि 'वसुधैव कुटुंबकम्' हा संदेश देण्याचे कार्य भगवंतानेच आपल्यावर सोपविलेले आहे. हेच आपले जीवनकार्य आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' हे आपल्या राष्ट्राचे जीवनध्येय आहे, परंतु ध्येय कितीही श्रेष्ठ जरी असले त्याच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ नसले तर तुमचे कुणीच ऐकणार नाही. जोपर्यंत अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन घडवले नव्हते तोपर्यंत अर्जुन त्याचे ऐकायला तयार नव्हता शंकाकुशंका काढत होता. विश्वरूप दर्शन झाल्यावर मात्र त्याला गीतोपदेश पटला तो लढण्यास तयार झाला. आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घडवून आपल्याला सर्व प्रकारचे भेदभाव संपवायचे आहेत. आपल्या घरात काम करणारी मोलकरीण अथवा सफाई कर्मचारी यांना आपण सण-उत्सवात सहभागी करून घेतले पाहिजे. त्यांना आपल्याबरोबर पंगतीला भोजनासाठी बोलावले पाहिजे. काही ठिकाणी स्वयंसेवक या गोष्टी करीत आहेत. त्या आपण सर्वजणांनी केल्या पाहिजेत. दलित, गोंड, संथाल इत्यादी हिंदू समाजापासून वेगळे आहेत असा अपप्रचार करून या बांधवांना फुटीरतावादी शक्ती त्यांचे भक्ष्य बनवत आहेत. त्यांचे प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत.

सामाजिक समरसतेला केंद्रस्थानी मानून येत्या वर्षभरात भारतातील सर्व स्वयंसेवकांनी सामाजिक समरसता प्रस्थापित करण्यसाठी आचरणातून एक आदर्श प्रस्तुत केला पाहिजे. १९९० साली नागपुरात धर्मसंसद झाली होती तेव्हा शंकराचार्य, मध्वाचार्य सर्व धर्माचार्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता. काशीत धर्मसभा झाली तेव्हा ज्या डोमराजाच्या हाताखाली सत्यवादी राजा हरिशचंद्राने काम केले होते. त्याच्या वंशजाच्या घरी जाऊन सर्व धर्माचार्यांनी भोजन केले होते. अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी कामेश्वर चौपाल या अनुसूचित जातीच्या बांधवांच्या हातून शिलान्यास करण्यात आला होता. अशा रीतीने सर्व धर्माचार्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्या आदर्शाला अनुसरून सर्व समाजाला जागविण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट जेव्हा आपण करू तेव्हा संपूर्ण विश्वाला आपण नवीन संदेश देऊ, अशीच भविष्यवाणी आहे.

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरुबंधूंना १८९३-९४-९५ साली पत्रे लिहिली होती. त्या पत्रांत ते म्हणतात, '१८३६ साली जेव्हा रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला तेव्हाच युगपरिवर्तनाचा सूत्रपात झाला होता. एका नव्या सुवर्णयुगाच्या प्रारंभाची घोषणा झाली होती.' योगी अरविंद यांनी असे म्हटले आहे की, 'युगसंधीचा काळ १७५ वर्षांचा आहे. एक युग संपून दुसर्या युगाचा प्रारंभ जेव्हा होतो त्या दरम्यानच्या काळास युगसंधीचा काळ म्हणतात.' १८३६ मध्ये आपण १७५ वर्षे मिळवली तर २०११ हे वर्ष आपल्याला दिसते. म्हणून २०११ पासून भारताचा वैभवसूर्य अधिक तेजाने चमकू लागणार. येणार्या काळात संपूर्म जगाला एकता आणि बंधुभावाच्या सूत्रात गुंफण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आम्हाला नष्ट करण्यासाटी आसुरी शक्ती प्रयत्नशील आहेत. परंतु त्यांना घाबरात आपण यशस्वी होणारच!''

--------------------------------------------
साभार: सा. विवेक श्रीगुरुजी आणि सामाजिक समरसता विशेषांक

 


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive