Sunday, June 6, 2010

आमची पुढची पिढी कोट्याधीश आणि त्यापुढची अब्जाधीश होईल का?

मराठी माणसा पैसा कमव.

मराठी माणूस पैसा मिळवायला घाबरतो असे तुम्हाला वाटते का? आपण मोठे व्यवहार करू शकत नही का? आपण अब्जाधिश होऊ शकतो का?

आज तरी याचे उत्तर नाही असेच आहे! ( काही राजकारणी वगळता).

क्रिकेटमधे पैसा नव्हता तोपर्यंत भारतीय टीममधे मराठी खेळाडू होते, आता फक्त सचिन.

सैन्यात आता पगार चांगले आहेत तर आपली संख्या कमी.

कोल सेंटर मधे असे होते आणि तसे होते म्हणून आपली मुले जात नाहीत. घरी बसतात. ते काम हवे.

शेअर बाजारात उतरायचे तर नाव नको.

जिथे जिथे पैसा आहे तिथून आम्ही लांब पळतो. धोका नको. असे का?

आज एखाद्याच्या जागेची किंमत २५ - ३० लाख असेल पण त्याशिवाय काही नसते. आम्ही नक्की कशात कमी पडतो? आमच्या गरजा जास्त आहेत का?

साधी रहणी शुद्ध विचारसरणी हे विसरलो का? भ्रष्टाचार आम्ही करतो पण चिरीमिरी एव्हढाच. त्यातही मोठी उडी नाही. मध्यंतरी 'तहलका' ने सैन्यातला भ्रष्टाचार उघडकीला आणला. कोटी-कोटी मागितले गेले. पण मी पार निराश झालो. त्यात एकही मराठी नाव नाही. तेव्हढी छातीच नाही. १००-२०० रुपये मिळले की खुश. हजारात म्हणजे डोक्यावरुन पाणी. लगेच दारू प्यायला मोकळे. त्या अधिकार्याने सांगितले होते की मझ्याशी नुसते शेकहयाण्ड करायचे असेल तर किमान एक ब्ल्यू लेबल बाटली आणली पाहिजे. तो पंजाबी होता.

आम्ही काय करायला हवे? पैसा मिळवणे, सांभाळ्णे, वाढवणे कसे जमेल? आमची पुढची पिढी कोट्याधीश आणि त्यापुढची अब्जाधीश होईल का?


पैसा कसा मिळवावा?

 

पैसा म्हणजे काय?
*
पैसा ही वस्तू व्यवहाराचे सर्वात सक्षम साधन आहे. वस्तूंच्या अदलाबदलीने होणाऱ्या व्यवहारांमधील प्रचंड गैरसोय पैशाच्या वापराने दूर झाली.
*
वस्तू आणि सेवा या दोन्हींचे मूल्य पैशात करता येत असल्यामुळे पैसा हे माध्यम सर्वच व्यवहारांना उपयुक्त आहे.
*
पैसा हे संपत्तीचे अर्थात श्रीमंतीचे मोजमाप आहे.

पैसा कसा मिळवावा?
* "
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी', ही तुकोबांची उक्ती डोळ्यासमोर ठेवून पैसा मिळवावा आणि खर्च करावा. धन मिळवण्याच्या मार्गाच्या भलेपणाविषयी थोडी जरी शंका असेल, तरी तो मार्ग त्याज्य समजावा.
*
प्रामाणिकपणे कोणाचीही फसवणूक करता आणि उचित व्यवहारांचा अवलंब करून पैसा मिळवावा.
* "
पैसा म्हणजेच सर्व काही आहे,' हे मानणारे पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. मिळविलेल्या पैशाचा आनंद घेता येईल इतकाच पैसा मिळवावा.

अधिक पैसा म्हणजे अधिक चांगले जगणे, हे बरोबर आहे का? ते कसे साध्य करावे?
*
पैसा सुज्ञ माणसाच्या फक्त मनात असावा; हृदयात नसावा.
*
चांगले जगणे म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होऊन शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांचा लाभ मिळणे. यासाठी किती पैसा हवा, हे त्या व्यक्तीच्या मनोभूमिकेवर अवलंबून असते.
*
सुखी आयुष्य जगायला एका मर्यादेपर्यंतच पैसा आवश्यक असतो. त्यापेक्षा अधिक मिळालेला पैसा, ते परतफेड करू शकणार नाही, अशांसाठी खर्च केला तर त्याचे समाधान शब्दातीत आहे.
* "
चंगळवाद वाईट' असे म्हणताना चंगळवादाची व्याख्या कालमानानुसार बदलत जाते, हे लक्षात ठेवले पाहिजे. कालची चैनीची वस्तू आज गरजेची बनते. पूर्वी घरातील सर्वांसाठी एकच फोन असे. आता लहान मुलासह प्रत्येकाकरिता तो आवश्यक बनला आहे. पण नवीन मॉडेलच आपल्याकडे हवे, हा अट्टहास चुकीचा आहे.
*
वाजवी अपेक्षा बाळगून आणि अनावश्यक स्पर्धा टाळून आयुष्य सुखी व्हायला मदत होईल.

कौटुंबिक अर्थसंकल्प कसा करावा?
*
आर्थिक नियोजन सर्वांसाठी आवश्यक आहे आणि अर्थसंकल्प हे त्याचे फलित. असे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी घरातील सर्वांनी एकत्र बसून विचारविनिमय करून समान भूमिका निश्चित करणे आवश्यक.
* "
आपल्याला कोठे जायचे आहे' ते आधी ठरवावे. म्हणजेच साधारणपणे पुढच्या 10-15 वर्षांची योजना तयार करावी- ज्यात ठळक बाबींचा समावेश असेल. तसे केले तर म्युच्युअल फंडातील "एसआयपी'सारखी नियमित गुंतवणूक आजच चालू करता येते.
*
अर्थसंकल्पात घरातील सर्वांच्या इच्छा-आकांक्षाचे प्रतिबिंब दिसणे अपेक्षित आहे आणि त्या पूर्ण करण्याकरता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याची बांधिलकी राहते.
*
परिस्थितीनुसार अर्थसंकल्प बदलावा लागेल, याचेही भान ठेवले पाहिजे. जमा आणि खर्च या दोन्हींचा विचार करताना, जमा रक्कम अपेक्षेपेक्षा कमी धरावी आणि खर्च मात्र जास्त होईल, असे समजावे.
*
आवश्यक त्याकरिता आवश्यक तेवढेच कर्ज घ्यावे, जे व्यवस्थितरीत्या नंतर फेडता येईल.

पंधरा हजार रुपयांत घर कसे चालवावे?
*
तुम्ही ज्यावर खर्च करता, यावरून तुमच्या आयुष्यात महत्त्व कशाला आहे, ते कळते.
*
आपला जमा आणि खर्च किती होतो, याचा अनेक जणांना पत्ताच नसतो. 8020 तत्त्वाचा उपयोग करून महत्त्वाचे खर्च लिहून ठेवावेत. सर्वात जास्त रकमेपासून खर्च कमी करायला सुरवात करावी.
*
रु. 13 हजार एवढ्याच रकमेचा खर्च करता येईल, हे आधीच पक्के ठरवावे. महिना किमान दोन हजार रुपयांची बचत किंवा गुंतवणूक करता आली पाहिजे. प्राधान्यानुसार खर्च करावा.

महागाईवर मात कशी करावी?
*
आर्थिक नियोजनात दोन वर्षांनंतरच्या खर्चाच्या बाबी निश्चित करताना त्यामध्ये वाढत्या महागाईचा विचार केला पाहिजे.
*
जमा-खर्चाची मिळवणी करताना काटकसर करण्यावरच भर दिला जातो. पण उत्पन्न कसे वाढेल, याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. नोकरी करणाऱ्याला आपली क्षमता वाढवून बढती किंवा अधिक पगाराची दुसरी नोकरी मिळवता येते, तर व्यावसायिकाला जास्त कार्यक्षमता दाखवून अधिक फायदा मिळवता येईल. चांगली गुंतवणूक करूनही पैसा वाढवून महागाईवर मात करता येते.
*
खर्च कमी करण्याची किंवा उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी घरातील सर्वांची आहे, फक्त गृहिणीची नाही. आवश्यकतेनुसार प्रत्येकानेच खर्चाला मुरड घातली पाहिजे किंवा अधिक पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला पाहिजे. उदा.- सुटीच्या दिवशी काम करणे, शिकवण्या करणे किंवा छोटा व्यवसाय करणे, आदी.

बचतीचे महत्त्व आणि तिचे नियोजन कसे करावे?
*
वयाच्या पंचविशीतच बऱ्यापैकी पैसा हाती खेळू लागल्यानंतर मौजमजेवर अधिक पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे याच वयापासून बचतीची सवय लागणे आवश्यक.
*
दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम कटाक्षाने बाजूला ठेवण्याची सवय लावून घ्यावी. कारण अडीअडचणीच्या वेळी हीच रक्कम उपयोगी पडते.
*
निव्वळ काही पैसे बाजूला ठेवणे किंवा बचत करणे किंवा बॅंकेत अथवा पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक नियोजन नाही.
*
आधी बचतीची सवय लागल्यास पुढे गुंतवणुकीची कास धरणे सोपे जाते. कारण बचतीनंतर येते ती गुंतवणूक.
*
बचतीतून उभे राहणारे पैसे तुमची तात्कालिक गरज भागवू शकतात, तर गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घ पल्ल्याची उद्दिष्टे साध्य करता येतात.
*
वाढत जाणारी महागाई, त्यायोगे वाढणारा वैद्यकीय खर्च, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कालांतराने गरजेची वाटू लागणारी निवृत्तीनंतरची तरतूद या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून कमावत्या वयातच आर्थिक नियोजन करावे.
*
आर्थिक नियोजनातील पहिली पायरी म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्ट निश्चित करणे.
*
बचतीची सवय, गुंतवणुकीचा मनोनिग्रह, जोखीम घेण्याची मानसिकता आणि तयारी यावरच उद्दिष्टपूर्ती अवलंबून.
*
गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या गरजेप्रमाणे गुंतवणूक प्रकारांचा आराखडा तयार केला पाहिजे.
*
बाजारातील विविध गुंतवणूक प्रकारांचा विचार करून आपल्या उद्दिष्टाला साजेशा गुंतवणूक प्रकारांची निवड करणे आणि त्यांचे प्रमाण निश्चित करणे महत्त्वाचे.
*
गुंतवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये 1) बॅंकेतील मुदतठेव योजना (एफ.डी.), 2) पोस्टाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अल्पबचत योजना (नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट अर्थात एन.एस.सी., किसान विकास पत्र, मंथली इन्कम स्कीम अर्थात एम.आय.एस., रिकरिंग ठेव योजना (आर.डी.) वगैरे), 3) निवडक राष्ट्रीयीकृत बॅंका तसेच पोस्टात राबविली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी.पी.एफ.) योजना, 4) सरकारी रोखे किंवा बॉंड्, 5) आयुर्विमा आणि युलिप, 6) पेन्शन प्लॅन्स, 7) म्युच्युअल फंड, 8) शेअर बाजार, 9) स्थावर मालमत्ता (घर, जमीन वगैरे), 10) सोने-चांदी यांचा प्रामुख्याने समावेश.
*
आपले वय आणि त्याच्या प्रमाणात जोखीम स्वीकारण्याची क्षमता यावर गुंतवणुकीचे प्रमाण ठरवावे. जर तुम्ही 40 वर्षांचे असाल तर 40 टक्के गुंतवणूक सुरक्षित निश्चित उत्पन्न देणाऱ्या ठेव योजनांत 60 टक्के शेअर बाजार किंवा त्याच्याशी जोडलेल्या गुंतवणूक साधनांत करणे योग्य.
*
जसे वय वाढत जाते तसे जोखीमपूर्ण गुंतवणुकीचे प्रमाण कमी करत जाणे श्रेयस्कर.

आर्थिक हिशेबाच्या, गुंतवणुकीच्या नोंदी कशा ठेवाव्यात?
* "
टु ब्रेक रेकॉर्ड, कीप रेकॉर्ड' ही उक्ती आर्थिक नियोजनातही लक्षात ठेवावी.
*
आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य होत आहे किंवा झाले आहे, हे लक्षात येण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
*
विमा, मुदतठेवी, पोस्टातील गुंतवणूक, शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉंड् आदी प्रकारांतील गुंतवणुकीचे तपशील एका वहीत टिपून ठेवावेत. शक् असेल तर संगणकात "एक्सेल शीट'मध्ये मांडणी करून "सेव्ह' करून ठेवावे.
*
पॉलिसी क्रमांक, खाते क्रमांक, ठेव पावती क्रमांक, फोलिओ नंबर, डिमॅट नंबर या महत्त्वाच्या नोंदीबरोबरच मुदतपूर्तीची तारीख, परतीची रक्कम आदींसाठी रकाने करून ते वेळच्या वेळी भरावेत.
*
यादी करताना मुदतपूर्ती म्हणजेच पैसे परत कधी मिळणार आहेत, त्या तारखेला प्राधान्य द्यावे. म्हणजे एक-एक गुंतवणूक प्रकार संपला आणि त्या बदल्यात पुन्हा नव्याने गुंतवणूक केल्यास त्याचा अग्रक्रम बदलावा. अशा यादीमुळे तुमची "आर्थिक तब्येत' एका दृष्टिक्षेपात कळू शकेल.

अपुरी मिळकत असेल तर जोड काय देता येईल? कशी? अधिक पैसा मिळविण्याच्या स्वतःच्या क्षमतांचा शोध कसा घ्यावा?
*
नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारी रक्कम आपला घरसंसार चालवायला पुरेशी ठरत नसेल, तर त्याला आपल्या क्षमतेनुसार जोड देता येऊ शकते.
*
अशी जोड देण्यापूर्वी आपल्या हाताशी असणारा वेळ, पात्रता, मिळणारे उत्पन्न यांचा प्रामुख्याने विचार करावा.
*
एखाद्या किराणा दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला पहाटे किंवा सकाळच्या वेळेत घरोघरी वृत्तपत्रे वितरित करणे, दुधाच्या पिशव्या नेऊन देणे आदी कामे करून आपल्या मिळकतीला जोड देता येऊ शकते.
*
आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे सहजशक् नाही. मात्र आपल्यातील कलागुणांना वाव देऊनदेखील चार पैसे मिळविता येऊ शकतात. उदा.- विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेणे, वाद्य वाजवायला शिकवणे, क्रीडा प्रशिक्षण देणे.

जोडधंद्याचे धाडस कोणी करावे? ते कसे पेलावे?
*
धाडस हा श्रेष्ठ गुण आहे; पण आपल्याला काय करायचे आहे, काय हवे आहे, याचा निर्णय आधी करायला हवा.
*
धाडसाच्या शेवटी यश हवे असेल, तर नीट तयारी करून जोखीम घेणे जरुरीचे आहे.
*
धाडस करताना प्रसंगी जायबंदी होण्याची किंवा इतरांची सहानुभूती मिळता जखमी होण्याची तयारी हवी.
*
जोडधंद्याचे धाडस करताना आपली कुवत, जोखीम घेण्याची क्षमता तपासून पाहायला हवी.
*
जो धाडस करतो, धडपडतो, प्रयत्न करतो, अपयशाने खचून जाता त्यातून शिकून बाहेर पडतो, तोच यशस्वी होतो, हे लक्षात ठेवावे.
*
धाडस करताना मनाची शरीराची तंदुरुस्ती महत्त्वाची असते. स्वतःमध्ये निर्भयता हवी, बिनधास्त वृत्ती हवी, झोकून देण्याची तयारी हवी, संकटावर मात करण्याची क्षमता हवी. हे सर्व अंगी बाणवून त्याप्रमाणे वागण्याची तयारी असणाऱ्यांनीच धाडस करावे.
*
तोलूनमापून घेतलेली जोखीम (कॅलक्युलेटेड रिस्क) आणि अभ्यास करता पत्करलेली जोखीम यात फरक आहे.
*
जोडधंद्याचा अभ्यास करून धोका पत्करणे योग्य. अन्यथा सपाटून अपयश येण्याची शक्यता अधिक.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive