Friday, November 19, 2010

मत कोणाला आणि कशासाठी ?



मतदान करण्यापूर्वी नक्की वाचाच
तुम्ही एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले तर तो खरच तुमचे प्रतिनिधित्व करतो का ?
तुमचे जे मत आहे ते त्याने वेळोवेळी विधानसभेत मांडले तर त्याला लोकशाही म्हणता येईल परंतु तसे घडत नाही कारण
तो निवडून येईपर्यंत उमेदवार असतो निवडून आल्यानंतर तो पक्षाचा असतो किंवा त्याच्यावर पक्षाची हुकुमत चालते.
पक्षाची जी भूमिका वा ध्येयधोरणे आहेत ती त्याला राबवावी लागतात नाहीतर त्याच्यावर पक्षशिस्तीचा बडगा उगारला जातो.
समजा त्याला असे वाटले कि पक्षाची भूमिका निवडून दिलेल्या जनतेच्या भूमिकेच्या विसंगत आहे तरी तो विधानसभेत त्याविरुद्ध बोलू शकत नाही किंवा मतदान करू शकत नाही कारण असे केल्याने त्याच्यावर पक्षांतर कायद्याखाली कारवाई होऊ शकते आणि Image by Enrico Fuente via Flickr

त्याची निवड रद्द होऊ शकते.कारण तुम्ही ज्याला निवडून देता त्याच्यावर आता पक्षाचा हक्क असतो त्यामुळे अशाप्रकारे लोकप्रतिनिधी निवडून दिलेल्या जनतेच्या विरुद्ध भरपूरवेळा भूमिका घेतात.
निवडणूक आली कि आपण मतदानाचे कर्तव्य निभावतो आणि ५ वर्षासाठी आपल्यावर कोणी व कसे राज्य करायचे हे ठरवतो.
आता राज्यात विधानसभेची निवडणूक येत आहे आणि आपण मतदानाला सामोरे जाणार आहोत.
त्यावेळी आपण २ कामे करत असतो एक आपला प्रतिनिधी आपण विधानसभेत पाठवत असतो.तसेच एका पक्षाला वा ठराविक राजकीय धोरणांना पाठींबा देत असतो.

मग अशावेळी आपले लोकशाहीतले नक्की स्थान काय ?
आपण मतदान करतो ते कोणाला आणि कशासाठी ?
यासाठी अशावेळी आपण स्वताचे मत काय आहे याचा विचार केला पाहिजे .
आपण मतदान कशाच्या आधारावर करतो हे महत्वाचे आहे जसे
१]राज्याच्या कारभाराचे मूल्यमापन करून पक्षाला
२]विभागाला उपयोगी ठरेल अशा उमेदवाराला
३]धर्म वा जातीच्या आधारावर
४]कि एखाद्या भावनिक मुद्द्याच्या आधारावर
जर डोळसपणे मतदान केले तर आपले हितसंबंध आणि भावना जपणारे लोकप्रतिनिधी निवडून देता येऊ शकतात कारण मिरजे मध्ये जो प्रकार झाला त्यावेळी तेथील जनतेच्या भावना वेगळ्या होत्या आणि अशावेळी त्या परिसरातले मंत्री आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात म्हणून मुंबई दिल्लीत काथ्याकुट करत बसले होते जनतेच्या भावना तेथील एकाही लोकप्रतिनिधीला समजल्या नाहीत.

आजकाल प्रत्येक पक्षावर मताचे राजकारण केल्याचे आरोप होत असतात.
अल्पसंख्याकांचे लांगुनचालन केले जाते असाही आरोप होत असतो परंतु आसे का घडते ?

मुस्लीम मत कमी प्रमाणात असताना हि त्यांचेच लाड का केले जातात आणि हिंदू बहुसंख्य असतानाही त्यांच्या भावनांना केराची टोपली का दाखवली जाते याचा विचार केला पाहिजे.
मतदान करण्यापूर्वी आपले मत बनवायला हवे कुठल्या निकषावर वा मुद्द्यावर आपण मत देणार आहोत हे ठरायला हवे.
हिंदुत्ववादी शिक्का असल्याने युतीला मुस्लीम मते कधीच मिळत नाहीत त्यामुळे ती 'एकगठ्ठा' मते झाली आहेत आणि त्यासाठीच सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष हिंदुत्वावर बोलून मुस्लिमांना चुचकारत असतात.
मुस्लीम समाज हि हिंदुत्व विरोधाला प्राधान्य देऊनच एकगठ्ठा मतदान करत असतो.म्हणजे
आधी मुस्लिमांचे मत तयार असते आणि नंतरच त्यांचे मतदान होते.
त्यामुळेच मुस्लीम बहुल भागात प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा मुस्लिमच असतो.
मत हे असे प्राधाण्यातून येत असते.

विकासाची योजना,रस्ते,दवाखाना,पाणी,वीज,जीवनावश्यक गोष्टी इत्यादी मुद्दे प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमात असतातच कि परंतु कठीण प्रसंगी राजकारणी कोणाला झुकते माप देतात यावर मुस्लीम मते बनवली जातात.
त्याचा प्रभाव मिरज- मालेगाव भागात दिसून येतो.
त्यामुळे मतदान करण्यापूर्वी मतदाराने आपले मत बनवले पाहिजे आपण आपल्या जातीला,धर्माला,ओळखीला,विकासाला,हितसंबंधाला कशाला प्राधान्य देणार हे ठरवले पाहिजे मगच आपले मत तयार होत असते.
कोणत्याही मतदार 'समूहाचा' पक्षाच्या धोरणावर आणि उमेदवार ठरवण्यावर परिणाम होत असतो आपण तसे मत बनवतो का ?
याचा विचार प्रत्येकाने करावा.
आपण एकगठ्ठा मतदानाचा विचार करत नाही तिथेच आपल्या मतच पराभव झालेला असतो भले आपण मत दिलेला उमेदवार निवडून येईल परंतु कठीण प्रसंगात मिराजेसारख्या घटनेवेळी आपला लोकप्रतिनिधी आपल्या रक्षणासाठी उभा राहील याची खात्री देता येणार नाही.

त्यामुळे आता मतदाराने मतदान करण्यापूर्वी आपले मत कोणाला वा कशासाठी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे म्हणजेच लोकशाही यशस्वी होईल.
नाहीतर अल्पमत हे बहुमतावर आणि अल्पसंख्यांक बहुसंख्याकांवर हवी होत राहील वा कुरघोडी करत राहील आणि मग ती लोकशाही नसेल.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive