Friday, March 22, 2013

Dictionary-man Marathi to English

डिक्शनरीमॅन
वेगवेगळ्या क्षेत्रात पायाभूत काम करणा‍-या यंग अचिव्हर्ससाठी गेल्या वर्षांपासून ' महाराष्ट्र टाइम्स ' ने ' यूथ आयकॉन ' पुरस्कार द्यायला सुरुवात केली. मागच्या वर्षीचा पहिला यूथ आयकॉन होता , काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी तिथेच अनाथाश्रम सुरू करणारा पुण्यातील तरूण अधिक कदम. यंदा हा किताब पटकावलाय बारा भाषांतली डिक्शनरी तयार करणा‍ऱ्या , नाशिक जिल्ह्यातल्या एका खेड्यात लहानाचा मोठा झालेल्या सुनील खांडबहाले या तरूणाने.
http://archive.loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20100809/edt02.jpg
 







नाशिकपासून २० किलोमीटर अंतरावरचं महिरावणी खेडं. तिथल्या एका शेतवस्तीवर खांडबहाले नावाचं शेतकरी कुटुंब राहतं. नातेवाईकांमध्ये आणि फारतर आजूबाजूच्या पंचक्रोशीपलीकडे खांडबहाले हे नाव पोहोचण्याचं तसं काही कारण नाही. पण , आज दीडशे देशांतल्या सहा कोटी लोकांना खांडबहाले हे नाव परिच‌ित झालंय. साधारण पाच लाख लोक खांडबहाले हे नाव दिवसांतून एकदा तरी घेतात. ही करामत साधलीय khandbahale.com चा निर्मात्या सुनील खांडबहाले या 'MAD' तरुणाने. सुनीलच्याच भाषेत सांगायचं तर 'MAD' म्हणजे मोटीव्हेटेड अँड डेडीकेटेड.

हातातोंडाची मिळवणी करण्याच्या संघर्षाने आयुष्य व्यापलेल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात सुनील लहानाचा मोठा झाला. जीवनानुभवाच्या चटक्यानी जगणं पोळत राहिलं , तरी सुनीलने ' स्वतःचं काहीतरी भव्यदिव्य ' करण्याचा मनातला अंकुर कधीच करपू दिला नाही. त्यालाच गेल्या तेरा वर्षांपासून जोपासत , कष्टाच्या घामाचं सिंचन करत सुनीलने khandbahale.com नावाचा वटवृक्ष फुलवला आहे. प्रचंड मोठ्या शेतकरी खटल्यामध्ये मुलांना वाढवतांना सुनील आणि त्याच्या भावंडाना त्यांच्या आईवड‌िलांनी शिक्षणाचं बाळकडू पाजण्यात कधीच कसूर केली नाही. पाण्यात भाकरी बुडवून खाण्याच्या दिवसांमध्येही त्यांनी या मुलांचा हात शिक्षणापासून सुटू दिला नाही. त्यातूनच सुनील दहावीला चांगल्या मार्कांनी पास झाला आणि इंजिनिअरिंग डिप्लोमाला गेला. पण , तिथलं इंग्रजी शिकवणं पूर्णपणे त्याच्या डोक्यावरून जाऊ लागलं. न्यूनगंडाने उमेद खच्ची करून टाकली होती. शिक्षण सोडण्याचे विचार मनात गर्दी करू लागले. अशा अवघड वळणावर सुनीलला डिक्शनरी नावाचा प्रकार समजला. या डिक्शनरीशी सुनीलचं मैत्र जुळलं आणि मग त्याने डिप्लोमात चक्क पहिला नंबर पटकावला.

' आपणासी ठावें ते दुसऱ्यासी सांगावे ' या उक्तीनुसार सुनीलला त्याच्यासारख्याच अन्य लोकांपर्यंत डिक्शनरी पोहोचावी , असं वाटू लागलं. त्यासाठी त्याने आधी झेरॉक्स , मग प्रकाशन अशा पर्यायांचा विचार सुरू केला. पण , सगळं गणित पैशाशीच अडत असल्याने सुनीलने तो विचार बाजूला ठेवला. एकीकडे ' स्वतःचं काहीतरी ' करण्याची ओढ आणि दुसरीकडे आर्थिक ओढगस्त. अखेर त्याने नोकरीची शोधाशोध सुरू केली. दरम्यान , अनेक खस्ता खाल्ल्यावर नोकरी मिळाली खरी. पण तिथे मन रमत नव्हतं. तरी सुनिल नोकरी करत राहिला. कारण तिथेच त्याला कम्प्युटर नावाचं अजब यंत्र प्रथम भेटलं. त्याने सुनीलला पार झपाटून टाकलं. सुनील म्हणतो , ' मी पहिल्यांदा माऊस हातात धरला तो चेंडूसारखा! ' पण , स्वतःच अभ्यास आणि प्रॅक्टीस करत सुनीलने कम्प्युटरशी दोस्ती केली. या कंपनीतील प्रॉडक्ट वारंवार दुरूस्तीसाठी येतं , हे पाहून सुनीलने त्याच्या साहेबांना त्यामागचं कारण विचारलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं , ' हे मशिन आपण संभाव्य क्लायंटकडे पाठवतो. त्यासोबत कंपनीची चार माणसंही जातात आणि तिथे डेमो देतात. तो पसंत पडला तर क्लायंट मशिन घेतो नाहीतर परत पाठवतो. ही ये-जा करण्यात मशिनला इजा होते आणि ते दुरुस्तीसाठी येतं. '

हा ' द्राविडी प्राणायाम ' कसा टाळता येईल , जेणेकरून कंपनीचा इतका मोठा खर्च वाचू शकेल ,' असा विचार सुनील करू लागला. अखेर त्याने स्वतःच उपलब्ध सुविधा वापरून त्या मशिनची इत्यंभूत माहिती देणारं एक साधं सॉफ्टवेअर तयार केलं. ते त्याने साहेबांना दाखवलं आणि त्यांनीही लगोलग सुनीलची ही कामगिरी कंपनीच्या प्रेसिडेंटसमोर मांडली. सुनीलच्या इनोव्हेशनवर खूश होऊन त्यांनी सुनीलला हे सॉफ्टवेअर अधिक सक्षम बनवण्यासाठी कामाची पूर्ण मोकळीक आणि हवी ती मदत उपलब्ध करून दिली.

मिळालेल्या संधीचं सोनं करत सुनीलने असं काही प्रभावी सॉफ्टवेअर तयार केलं की , आता यापुढे कंपनीला ना मशिन प्रत्यक्ष पाठवावं लागणार होतं , ना चार-चार लोकांच्या येण्या-जाण्याचा खर्च करावा लागणार होता. यामुळे मोठी बचत होणार होती. सुनीलच्या या सॉफ्टवेअरचं प्रेझेंटेशन पाहण्यासाठी स्वतः मालक त्या दिवशी कंपनीत हजर होते. सुनीलला खूप शाबासकी मिळाली. कंपनीच्या प्रेसिडेंटने खूश होत त्याच्या पगाराइतकी बक्षिसी आणि अशाच काही सॉफ्टवेअरची पर्चेस ऑर्डरही सुनीलला दिली. कंपनीची नोकरी सोडून बाहेर पडण्याआधीच सुनीलच्या हातात स्वतःची कंपनी होती , तिला लागणारं भांडवल आणि पर्चेस ऑर्डरही होती. हाती आलेल्या पैशातून सुनीलने कम्प्युटर घेतला. त्यावर सॉफ्टवेअरची कामंही सुरू केली. कामं आणि त्यासोबत पैसाही मिळू लागला. पण स्वतःचं काहीतरी करण्याची ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देईना. तेव्हा सुनीलला आठवली ती डिक्शनरी. मग कम्प्युटरवर वापरता येईल अशी इंग्रजी-मराठी डिक्शनरी तयार करण्यासाठी सुनील झपाटून कामाला लागला. तब्बल अडीच वर्षं सुनील वेड्यासारखा या डिक्शनरीवर काम करत होता. इतका की सारखा बसून राहिल्याने त्याच्या कमरेतून एके दिवशी रक्त येऊ लागलं. पण , अखेर त्याने ही डिक्शनरी बनवलीच. त्यात शब्द शोधण्यासाठी सुनीलने तयार केलेला प्रोग्राम म्हणजे सर्च इंजिनच होतं. ते साल होतं १९९९. सध्या सर्च इंजिनचा पर्यायी शब्द बनलेल्या ' गुगल ' चा जन्मही त्यानंतरचा म्हणजे २००२ सालचा!

इंग्रजी-मराठी डिक्शनरी बनवली तरी मराठी माणसाला मराठीतून इंग्रजी डिक्शनरीची अधिक गरज आहे , हे लक्षात घेऊन मग सुनीलने तेही काम पूर्ण केलं. मग अन्य भाषांसाठीही हेच काम सुनीलने हाती घेतलं. तोवर डॉटकॉमचं वारं वाहू लागलं होतं. त्याची दिशा ओळखून सुनीलने मग डिक्शनरी इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला. पण डिक्शनरीशी संबंधित बहुतांश नावांच्या वेबसाईट आधीच रजिस्टर झालेल्या. अखेर सहज म्हणून त्याने khandbahale.com असं नाव घेतलं आणि वेबसाईट सुरू केली. ही इंटरनेटवरची पहिली इंग्लिश-मराठी डिक्शनरी. मराठीप्रमाणेच अन्य भाषांमध्येही अशा डिक्शनरीजची गरज होतीच. ती ओळखत सुनीलने एकेक भाषा अॅड करण्यास सुरूवात केली. त्याचा हा प्रवास १२-१२-१२चा मुहूर्त साधत वेबसाईटवर बारा भाषांची डिक्शनरी उपलब्ध करून देण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे khandbahale.com युजर्सची संख्या ६ कोटींवर पोहोचली आहे. या वेबसाईटला दिवसाला ५ लाख हिटस् मिळतात आणि दीडशे देशांतून लोक ही वेबसाईट पाहतात.

मोबाईलचा बोलबाला सुरू झाला तसा सुनीलने त्यावरही डिक्शनरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण दररोज बदलत जाणारं मोबाईलचं विश्व काही त्याच्या आवाक्यात येईना. पण त्यावरही मात करण्यात तो यशस्वी ठरला. पण , ९६० कोटी मोबाईलपैकी अवघे ७ टक्केच स्मार्टफोन आहे आणि डिक्शनरीची खरी गरज उरलेल्या लोकांनाच अधिक आहे , हा विचार सुनीलला स्वस्थ बसू देईना. सामान्य माणसाकडे असणाऱ्या साधारण फोनवरही डिक्शनरी उपलब्ध असावी या तळमळीतून सुनिलने २०१२ साली जगातली पहिली इंग्रजी-मराठी एसएमएस डिक्शनरी बनवली आणि ती कुठल्याही व्यावसायिक लाभाशिवाय लोकांना खुली करून दिली. आजमितीस १५ लाख लोक ती वापरतात. गुगलचा लँग्वेज पार्टनर , नोकीयाचा डेव्हलपर अशा अनेक संधी सुनीलला लाभल्या आहेत. काम करण्यासाठी प्रचंड अवकाशही त्याला उपलब्ध आहे. पण , काम वाढविण्याइतकंच महत्त्व सुनील केलेलं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यालाही देतो. याच ओढीतून पाड्यापाड्यावरच्या मुलांची एम्पॉवरमेंट व्हावी म्हणून सुनील त्याचं कुटुंब आणि मित्रपरिवारासह ' एज्युकेशन ऑन व्हील्स ' या प्रयोगासाठी झोकून देतो. या प्रयोगातून तो पाड्यापाड्यांवरच्या मुलांपर्यंत शिक्षण घेऊन जाण्यासाठी धडपडतो आहे. कारण , त्यांच्यातून त्याला त्याच्यासारखे अनेक सुनील घडवायचे आहेत!

पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे जगात प्रथमच कॉम्प्युटरवर ‘मराठी डिक्शनरी’, पहिली ‘ऑनलाइन मराठी डिक्शनरी’ व आता पुन्हा एकदा सर्वप्रथम भारतीय भाषेतील ‘मोबाइल डिक्शनरी’ प्रत्यक्षात आणणारा सुनील आजही आपल्या गावातल्या मातीशी निष्ठेने इमान राखून आहे. आपल्या अभिनव आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे आजमितीस दररोज लाखभराहून अधिक जणांना आपल्या वेबसाइटकडे आकर्षित करणाऱ्या सुनीलची पाश्र्वभूमी अत्यंत सामान्य. नाशिकजवळच्या महिरावणी या खेडेगावात टिपिकल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या सुनीलने पहिल्यांदा नाशिक पाहिले ते दहावीच्या परीक्षेसाठी आणि प्रथम मुंबई पाहिली तीदेखील एकविसाव्या शतकातच. जात्याच बुद्धिमान असणारा सुनील कोश वाङ्मयासारख्या अत्यंत किचकट क्षेत्राशी बांधला गेला तो जीवनाची गरज म्हणून. दहावीला चांगले मार्क मिळविल्यावर त्याने अहमदनगरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इन्स्ट्रमेंटल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला, पण खेडय़ातल्या मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे त्याला तेथे माध्यमाची आणि भाषेची चांगलीच अडचण जाणवू लागली. अगोदरच मराठीऐवजी इंग्रजी माध्यम आणि त्यातही संपूर्ण अपरिचित अशा तांत्रिक शब्दांचा भरणा. कुणाला विचारण्याची सोय नाही. अशा वातावरणात सगळा अभ्यास त्याच्या डोक्यावरून जाऊ लागला. त्याने मग वर्गात न समजलेले इंग्रजी शब्द वहीत उतरवून घ्यायचे आणि रूमवर आल्यावर त्याचे ‘डिक्शनरी मिनिंग’ जाणून घ्यायचे, असा परिपाठ सुरू केला. त्यामुळे त्याची ‘व्होकॅबिलिटी’ समृद्ध होऊ लागली आणि प्रथम वर्षांला ६० पैकी जे केवळ चौघे उत्तीर्ण झाले, त्यातही अव्वल म्हणून स्थान पटकावत त्याने बाजी मारली. तीन वर्षांंत त्याच्याकडे तब्बल २० हजार शब्द जमले. त्याचा आपल्याला फायदा झाला, तसाच हजारो-लाखो तरुणांनाही तो व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या वापरात सुलभता यावी, या उद्देशाने सुनीलने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. अनेकांची मदत व मार्गदर्शन घेत अत्यंत चिकाटीने त्याने वर उल्लेखलेले एक-एक उपक्रम अथक मेहनतीने पूर्ण केले. सुनीलच्या घरची पाश्र्वभूमी शिक्षणाची अजिबातच नाही. वडील केवळ चौथीपर्यंत शिकलेले, तर आई निरक्षरच. सुनील आणि त्याच्या भावांनी आईला चांगली अक्षर ओळख करून दिल्याने ती वाचू लागली आहे. नाशिकच्या महात्मानगर परिसरात त्याने सध्या आपले कार्यालय सुरू केले असले तरी आजदेखील त्याचे वास्तव्य आहे ते महिरावणी गावातील शेतातल्या घरातच. त्यामुळेच त्याच्या सामाजिक जाणिवा अजूनही घट्ट आहेत. तो गावाकडच्या मुलांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. हजारो रुपये फी भरण्याची ऐपत नसल्याने संगणकाच्या अधिकृत अभ्यासक्रमापासून आपल्याला वंचित राहावे लागले, तसे इतरांना लागू नये, ही त्याची मनस्वी इच्छा आहे. त्यातूनच त्याने ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’ विकसित केल्यावर आपल्या गावातील मुलांवर एक प्रयोग केला. अर्धवट शाळा सोडावी लागलेल्या वा शिक्षण थांबवून शेतीकडे वळलेल्या काही तरुणांच्या मोबाइलवर त्याने ही डिक्शनरी लोड करून दिली व महिन्याभराने त्यांच्या इंग्रजी शब्दसंग्रहाची चाचणी केली. यामध्ये त्याला सकारात्मक प्रतिसाद आला आणि मग हुरूप वाढवून त्याने हा उपक्रम तडीस नेला. आता अन्य भारतीय भाषांवरही त्याचे अशाच स्वरूपाचे काम सुरू आहे. शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख अजय बोरसे यांनी सुनीलच्या ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’चा उपक्रम उचलून धरत तरुणांसाठी अशा पाच हजार डिक्शनरी पुरस्कृत केल्या आहेत. त्याला अर्थातच उत्तम प्रतिसाद मिळतोय, पण शासनस्तरावरून मात्र या बाबतीत अजूनही ‘सारे कसे शांत शांत’ अशीच स्थिती आहे.

खांडबहाले डॉट कॉम... कदाचित तुमच्या कानाला काहीतरी चुकतंय असं वाटलं असेल....पण शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुनील खांडबहाले या तरुणाच्या खांडबहाले डॉट कॉम या भाषा प्रसाराच्या वेबसाईटशी टाय अप करण्याची तयारी विकीपीडीयानं दाखवली आहे.

प्रादेशिक भाषांना सपोर्ट करत नसलेल्या मोबाईलमधेही सुनीलनं तयार केलेली भारतीय भाषांची डिक्शनरी सहज इन्स्टॉल होते. नोकीयासारख्या कंपनीनं त्याबद्दल सुनिलला खास गौरवलं देखील आहे. त्यानंतर सुनिलनं इंटरनेट एक्सप्लोररव्यतिरीक्त इतर ब्राउझर्ससुद्धा सपोर्ट करतील, अशा पद्धतीचं प्रादेशिक भाषांचं सॉफ्टवेअर खांडबहाले डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिलंय.

जगभरातल्या दीडशे देशांधले चार कोटी नेटीझन्स त्याच्या साईटला भेट देउन भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या याच कामाची दखल घेउन विकीपीडीयानं एकत्रित काम करता येईल का याची चाचपणी सुरु केली आहे.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भारतीय भाषांच्या प्रचारासाठी सुनिलनं केलेल्या कार्याची दखल घेत त्याला भेटीसाठी आमंत्रित केलं होतं.

सुनिलकडे त्याच्या साईटबाबत असलेला डाटाही अतिशय इंटरेस्टींग आहे. ऑस्ट्रेलिया आणि चीन मधून हिंदी भाषेसाठी सर्वाधिक हिट्स त्याला मिळतात, तर अमेरीका, युरोप आणि बेल्जियमधूनही मराठी भाषा शिकण्यासाठी अनेक जण त्याची साईट अॅक्सेस करतात. 

इंटरनेट क्षेत्रात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये, दीर्घ काळ केवळ अमेरिकी कंपन्यांची मक्तेदारी होती. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. या स्पर्धेत भारतीय कंपन्याही आपला प्रभाव दाखवू लागली आहेत.

फेसबुक, ट्विटर, गुगल यांसारख्या अमेरिकी नेटवर्किंग वेबसाईटसचा बोलबाला असतानाच, www.khandbahale.com या भारतीय वेबसाईटने दरमहा १ कोटी हिट्सचा महत्वपूर्ण टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. सप्टेंबर महिन्यात ही संख्या ९६ लक्ष ६६ हजार होती, तर ऑक्टोबर महिन्याचा अखेरच्या दिवशी या साईटला भेट देणाऱ्यांची संख्या १ कोटी २२ लाख नोंदविण्यात आली.

भारतीय प्रादेशिक भाषांच्या आदान-प्रदानासाठी प्रसिद्ध असलेल्या या संकेतस्थळाला, जगभरातून रोज लाखो लोक भेट देत असतात. भाषातज्ज्ञ, भाषांतरकार, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये ही वेबसाईट विशेष लोकप्रिय मानली जाते. गुगलसारख्या सर्च इंजिनने आपणहून खांडबहाले.कॉमचे एकूण ५३ लक्ष ५० हजार पानांचे सूचिकरण आपल्या संग्रहात करून घेतले आहे, यावरूनच या वेबसाईटचा दबदबा लक्षात येतो.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य मायक्रोसोफ्टने भारतीय भाषा उद्योगांमध्ये प्रमुख म्हणून, खांडबहाले.कॉमचा गौरव केला आहे. मराठीसह, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळी, पंजाबी, बंगाली, संस्कृत अशा विविध भाषांमधील ४० लाखांहून अधिक शब्दसंग्रह असलेले शब्दकोश या साईटवर उपलब्ध आहेत. विशेष नमूद करायचे, तर हे शब्दकोश सर्वांसाठी ‘मोफत’ खुले करण्यात आले आहेत. त्याबरोबरच मोबाईल व टॅबलेटवरही ते डाउनलोड करता येतात.

मराठी माणूस उत्तम व्यवसाय करू शकत नाही, अशी मानसिकता असलेल्या व परदेशी स्थायिक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुण पिढीसाठी आपल्याच देशात राहून जागतिक स्तरावर काम केले जाऊ शकते, असा आदर्श वस्तुपाठच या कंपनीने घालून दिला आहे. हल्ली एखादी वेबसाईट सुरु करून ती परदेशी कंपन्यांना विकण्याचा प्रथा पडली आहे. अनेक परदेशी कंपन्यांकडून चांगल्या ऑफर्स धुडकावत नाशिकमधील सुनील खांडबहाले यांनी ही वेबसाईट स्वबळावर सुरु ठेवण्याचा धाडसी निणर्य घेतला. सध्या खांडबहाले.कॉमचे जगभरातील १५० देशांमध्ये ६ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.

कुठल्या देशातून किती लोक भेटी देतात, कोणत्या दिवशी कोणत्या वेळी ही संख्या कमी अधिक होते, मोबाईल अथवा संगणकाच्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टममधून आणि कोणत्या ब्राऊझरचा वापर केला जातो, अशी सर्व आकडेवारी नोंदविणारी सांख्यिकी-प्रणाली या संकेतस्थळावर कार्यरत आहे. विशेष बाब म्हणजे जगभरात विखुरलेले भारतीय या वेबसाईटच्या माध्यमातून एकत्र जोडलेले असतानाच, तब्बल १५ ते २० टक्के वापरकर्ते हे परदेशी म्हणजेच परकीय आहेत.

'तुम्ही भारतीय भाषा शिका, असे सांगायला आम्ही कुणाकडे गेलो नव्हतो, तर ती काळाची गरज आहे. शिकण्याचा ध्यास असलेले आपणहून उपलब्ध संसाधनांचा शोध घेतात', असे सांगताना सुनील खांडबहाले म्हणाले, की भारतीय भाषांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान हे एकमेव प्रभावी माध्यम आहे. आज अनेक परदेशी गुंतवणूकदार भारताशी सहकार्य करण्यास उत्सुक आहेत. भारतीय तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे हे खांडबहाले.कॉम च्येा उदाहरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सोबत - सांख्यिकी अहवाल आणि चित्र


Rony Dutta @ Prasad Bidapa Fashion ...

A recent international survey says children these days lose their innocence by the age of 12. So, are you a worried parent?

Early death of innocence

A recent international survey says children these days lose their innocence by the age of 12. So, are you a worried parent?

    Thanks to the pressures — and pleasures — of modern life, children these days lose their innocence by the age of 12. This startling fact came to the fore during a recent international survey, conducted for a popular parenting website in the UK.
    In fact, around 16% parents said that their child’s innocence was lost by the age of 10, thanks to the internet and celebrity culture. BT spoke to experts and parents in the city and found that the study holds true for Mumbai as well.

EXPERT SPEAK Consultant psychiatrist Dr Milan Balkrishnan says such cases are quite common in Mumbai. He says, “Kids these days mature faster — both physically and emotionally. The age of menarche and attaining puberty has also dropped. Indian children are exposed to adult content on the internet, social networking sites and television.”
    He adds that children are learning much more than the “birds and bees” at an early age. Innocence is lost, but it’s an expected outcome of the information
age.
    He recounts the case of a tween girl, who was brought for counselling by her parents. She was found exchanging inappropriate content on a social networking site. She was friends with much older boys online, making her parents further anxious.
    “The parents reacted by taking away her computer, mobile phone and clamping
down on her completely. She retorted by being irritable, aggressive and rebellious. She was being treated unfairly,” he recalls. 

PARENT SPEAK According to the survey, around 50% parents with daughters in their tweens say that the youngsters are under a lot of pressure to look thin.
    Sulekha Sharma, who
has a 12-year-old daughter, says, “My daughter is influenced by Kim Kardashian. She thinks her beauty is taking her places (which is true) and wants to be that way. My daughter feels good when someone calls her thin. A compliment such as ‘intelligent’ is way lower in her priority list than ‘pretty and thin’.”
    Sulekha also says children are overtly aware of information about sexual activities. Newspapers and internet have definitely influenced the young minds. “After the recent Nirbhaya gang-rape case in Delhi, I had to tell my daughter a lot of things to keep her safe. Had it not been for that incident, I would have told her all this a year later,” she says.
    Psychologist and child counsellor Chandni Mehta says the issue of children losing their innocence at an early age has been there for a while. Just that it’s becoming more common now. “Today, boys as young as 11 and 12 get very conscious about their looks. For example, they worry about pimples, acne, hairstyles, etc. They want to bunk class and indulge in smoking to appear cool and impress girls.”

PARENTS PARTLY RESPONSIBLE Apart from exposure to internet, social media, celebrity culture and peer pressure, parents are also responsible for kids losing their innocence at an early age, opines Mehta.
    Many parents give their children unlimited pocket money, surround them with gadgets, take them for shopping at high-end retail stores, etc. On the other end of the spectrum are parents who force their children to excel in everything — be it extracurricular activities or studies. Such parents also need counselling.

Young school girls are getting conscious about their looks and feel pressure to look thin


Avoid buying too many expensive gadgets for your kids

JOIN EARTH HOUR 2013 MAKE SURE YOU SWITCH OFF THE LIGHTS FOR ONE HOUR THIS SATURDAY

JOIN EARTH HOUR 2013

MAKE SURE YOU SWITCH OFF THE LIGHTS FOR ONE HOUR THIS SATURDAY



    Earth Hour is back, and it's bigger than ever before! This year, on Saturday, 23rd March 2013, switch off lights from 8:30 - 9:30 PM, and make the transition to renewable energy solutions. Pledge your support, and commit to action all year round.
    Earth Hour, till today, has inspired 7,001 cities and towns and around 152 countries and territories to work towards the envi
ronment. The message of Earth Hour 2013 is to make the switch to renewable energy. "The fight against climate change takes more than just one day of action. We must continue to conserve after that one hour also. You can write poems on Earth Hour which will be read out at our events," says V Appukuttan from Young Environmentalists NGO.
    Through this Earth Hour, every individual is advised to adopt household products powered by renewable energy, and organi
sations are requested to adopt the renewable energy solutions to run their business operations and production processes. Several environmentalists have also requested government to promote policies favourable to the production and uptake of renewable energy.
    Earth Hour has successfully united millions of people around the world as it strives to gain the support of more and more people. So, are you going to switch off ?

Want to help? Take five simple steps to reduce your impact on the environment and find out how much CO2 you can save in doing so here!
1. TRAVEL: Leave your car at home to go for work 2. HEATING: Reduce the temperature on your thermostat by one degree 3. COOKING: Cook a low -carbon meal 4. ENERGY PROVIDER: Switch to green energy 5. LIGHTING: Install energy efficient light bulbs





Important number Mulund West Police Station

MULUND factfile


> Important number  
Mulund West Police Station : 022-25684535, 022-25689844 
Navghar Police Station: 022-25637314 

> Schools  
St Mary's Convent High School: 022-25680920  
DAV International School: 022-25600011 
ST Pius High School: 022-25618844 
S M Shetty International School: 022-65618687 

> Pest Control  
Suraksha Pest Control: 022-22974368 
Yash Pest Control Service: 022-61425696 

> Hospitals  
Srushti Orthotech Hospital: 022-67303885 
Fortis Hospital: 022-49174633  
Shraddha Polyclinic & Nursing Home: 022-25675934 
Ashirwad Maternity & Nursing Home: 022-25912129 

> Banks  
State Bank Of India: 022-25604923 
Axis Bank : 022-25903689 
Bank Of India: 022-25689847 
HDFC Bank: 022-25905309 

> Chemists  
Noble Chemist: 022-61615290 
Wellness Forever Lifestyle Chemist: 022-25615654 
Apollo Pharmacy: 022-25902564 
Metro Chemists: 022-25620015 
Gala Medico: 022-25637717 

> Restaurants  
The Food Studio: 022-61613178 
Mulund Gomantak Restaurant: 022-21632035 
Dwarka Restaurant & Malwani Katta: 022-21630365 
Achija Veg Restaurant: 022-31902111 
Urban Tadka Restaurant: 022-21644473 
Rajdhani Thali Restaurant: 022-65888088

Thursday, March 21, 2013

PENGUIN NEW TITLE


ISBN13
name
AUTHOR1
currency
price
order
PUBLISHER
BINDINGTYPE
CATEGORY
SUBJECT
9780143420651
Salaam Bombay!
Taraporevala Sooni
INR
399

PENGUIN INDIA
Paperback
Others
CINEMA
9780143420750
THE HANGING OF AFZAL GURU
Roy, Arundhati
INR
299

PENGUIN INDIA
Paperback
Others
NON FICTION



Wednesday, March 20, 2013

new titles


Book Details




Book Image







Arrhythmias 101
Author:
Glenn N Levine
MD FACC FAHA




Price Rs. 695



ISBN
978-93-5090-499-2
Edition
1/e
Publish Year
2013
Pages
101
Size
9.5" X 6.25"
Cover Type
Paper Back
Quick Overview
The goal of this book is to give you enough of an understanding of arrhythmias that you can recognize what the arrhythmia is and initiate, when indicated, treatment of the patient. The thirteen simple chapters in this book are designed to allow you to quickly and easily achieve this goal.
Key Features
Arrhythmias 707 is the most easy-to-read and comprehensive introductory arrhythmia book there is. This book is designed to be read cover-to-cover in one sitting or several hours. This book uses simple, understandable language and 80 color illustrations, flow diagrams, and tables to introduce the reader to the different types of arrhythmias that occur in day-to-day real world practice. The book teaches the reader about the different types of arrhythmias, what causes them, how to recognize and diagnose specific arrhythmias, and how to treat them. The reader is introduced to a unique, simple three-step process that can allow any medical professional to diagnose the specific cause of any tachycardia. The book covers all types of arrhythmias, including tachyarrhythmias, bradyarrhythmias, and heart block. The book also introduces the reader to paced rhythms and Basic Life Support (BLS) and Advanced Cardiac Life Support (ACLS) algorithms for treating arrhythmias. This book is the perfect introductory arrhythmia book for physicians, residents and students, nurses and nursing students, physician assistants and PA students, emergency medical technicians, ER personnel, and any other health care professional who may be involved in the care of patients who develop arrhythmias.
Target Audience
Physicians, Residents and Students, Nurses and Nursing Students, Physician Assistants and PA Students, Emergency Medical Technicians, ER Personnel, and any Other Health Care Professional.

Book Details




Book Image







Minimally Invasive Spine Surgery: An Algorithmic Approach
Author:
Kern Singh
MD



Price Rs. 1495



ISBN
978-93-5090-484-8
Edition
1/e
Publish Year
2013
Pages
116
Size
8.5" X 11"
Cover Type
Hard Back
Quick Overview
This textbook attempts to formally describe a simple to understand decision-making process that is the essence of minimally invasive surgery. The readers will see that every chapter highlights the complex decision-making algorithm at the beginning of the text. The remainder of the chapter is devoted to the surgical pearls that are rarely mentioned in other surgical textbooks. All aspects of minimally invasive spine surgery are covered especially special topics including Tumor, Trauma and Deformity.
Key Features
The textbook Minimally Invasive Spine Surgery: An Algorithmic Approach is an algorithmically-based book heavy on decision-making processes and factors determining the most effective MIS approach. The chapters of this book are organized in a very technique-focused text that provides intraoperative pearls, pitfalls and technical descriptions. The reader can quickly review the decision-making algorithm at the beginning of each chapter and read the text for a more detailed description of the decision-making surgical process. Readers will enjoy a high-level sophistication with the text. Routine procedures are covered in detail with particular emphasis given to surgical nuances and pearls learned from experienced MIS spine surgeons. Additionally, special topic chapters are discussed in detail such as Tumor, Trauma and Deformity. All levels of experience will truly appreciate the detail, clarity and sophistication associated with this comprehensive MIS Spine Surgery algorithmic textbook.
Target Audience
Medical Students, Residents, Fellows and Surgeons.

Book Details




Book Image







Nutshell series for FMGE/DNB/NEET-PG General Surgery
Author:
R Rajamahendran
MS MRCS (Edinburgh) FAGE FMAS Dip Lap MCh
Surgical Gastroenterology (Postgraduate)

Panchadcharam Harinath
MD (Russia)




Price Rs. 395


ISBN
978-93-5090-505-0
Edition
1/e
Publish Year
2013
Pages
292
Size
8.5" x 11"
Cover Type
Paper Back
Quick Overview
FMGE: Foreign medical graduate examination (Medical council of India—MCI screening test) and NEET: National Eligibility Entrance Test are standard examinations conducted by National Board of examination (NBE) to validate the standard of Indian students with the international ones.

Nutshell series: Surgery for FMGE covers all the chapters systematically in a succinct and didactic fashion of presentation to aid in the glory of its users.

This guide is presented in tabular format with highlighted high yield points and equipped with more than 350 detailed illustrations that will enable the users to understand the core concepts clear and make the revisions faster.

MCQs are organized by the end of each chapter give users orientation towards the examination patterns.
Key Features
• Concise and comprehensive

• A complete book for surgery which needs no other reference

• Makes the students to cover surgery up to the core in 10 days

• Updates from latest editions of standard textbooks

• Concept-oriented text with exam-oriented highlights

• Easily understandable language and presentation

• More than 350 memory boosting illustrations

• Review of more than 600 high edged MCQs

• Covers all the concepts asked by national board examiners and hence strongly recommended for the NEET-PG and DNB entrance examinations.
Target Audience
NEET-PG and DNB Entrance Examinations.



Tuesday, March 19, 2013

मराठी मोहोर!


भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवी वर्षात मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली लखलखीत मोहोर उमटवली असून सोमवारी जाहीर झालेल्या ६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी कलाकारांनी वर्चस्व गाजवले.
usha.jpg
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ' अनुमती ' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असून त्यांना हा पुरस्कार इरफान खान (पानसिंग तोमर) यांच्यासोबत विभागून देण्यात आला. ' धग ' या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी उषा जाधव या अभिनेत्रीने पदार्पणातच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला , तर याच चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. आरती अंकलीकर-टिकेकर यांना ' पलके ना मुंदो ' या ' संहिता ' चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचे पारितोषिक मिळाले. ' संहिता ' साठीच सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार शैलेंद्र बर्वे यांना संयुक्तपणे (कलियाचन - मल्याळी चित्रपट) मिळाला. विशेष उल्लेखनीय पुरस्कारांत ' धग ' मधील बालकलाकार हंसराज जगताप याचा समावेश आहे. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेला ' इन्व्हेस्टमेंट ' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला असून ' मोदीखान्याच्या दोन गोष्टी ' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट कलासंस्कृती हा पुरस्कार जाहीर झाला. ' देख इंडियन सर्कस ' हा मंगेश हाडवळे दिग्दर्शित चित्रपट सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ; तर , ' कातळ ' हा सर्वोत्कृष्ट कथाबाह्य लघुपट ठरला.

' पानसिंग तोमर ' सर्वोत्कृष्ट चित्रपट

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दरोडेखोर बनलेल्या पानसिंग तोमर यांच्या जीवनावर आधारित ' पानसिंग तोमर ' या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. तिग्मांशू धुलिया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

' मटा ' कडून ' सन्मान '

महाराष्ट्र टाइम्सच्या शनिवारी झालेल्या ' मटा सन्मान ' सोहळ्यात चित्रपट विभागात ' धग ' नेच बाजी मारली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक( शिवाजी लोटन पाटील) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (उषा जाधव) , सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता ( उपेंद्र लिमये) , सर्वोत्कृष्ट बालकलाकार (हंसराज जगताप) आणि सर्वोत्कृष्ट पटकथा (नितीन दीक्षित) असे सहा पुरस्कार या चित्रपटाने पटकावले होते!

Aarti Ankalikar-Tikekar संगीताची श्रीमंती आरती अंकलीकर - टिकेकर


चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते. आरती अंकलीकर - टिकेकर यांना आवाजाची देणगी तर मिळालीच होती, जोडीला आईवडिलांचे संस्कार, गुरूंची आणि परमेश्‍वराची कृपा यांमुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनंच केलं...

आईनं शिकवलेलं पहिलं गाणं आठवतंय मला. "तार मय्या रघुकूल रामचंद्रैय्या.' आमच्या बाल्कनीत बांधलेल्या झोपाळ्यावर बसून मी झोके घेते आहे आणि आईनं शिकवलेली गाणी एका पाठोपाठ एक म्हणते आहे. पाच वर्षांची असेन मी! गाण्याचं जणू वेड लागलेलं... त्यातल्या सुरावटीचं, लयीचं आणि नादमय शब्दांचं. आई-बाबा दोघांनाही गाण्याची खूप आवड. गाणं हे व्यवसाय म्हणून स्वीकारायचा काळ नव्हता तो. त्यामुळं आई-बाबा हौशी गायक होते. माझ्या रियाझाची खरी सुरवात या झोपाळ्यावर झाली आणि पहिला गुरू म्हणजे माझी आई!

कालांतरानं मी वसंतराव कुलकर्णींकडे तालीम घेतली; आग्रा-ग्वाल्हेर घराण्याची. त्यानंतर किशोरीताईंकडे. मला असं वाटतं, चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (मेहनत, रियाझ) आणि संधी या चारही गोष्टींची गरज आहे; त्याचं प्रमाण कमी-जास्त असू शकतं. अतिशय उत्तम आवाज असणाऱ्याला मेहनत कमी करावी लागते; परंतु, जड आवाज असणाऱ्याला मेहनत जास्त करावी लागते. नैसर्गिक देणगी म्हणावी, तर मला निसर्गानंच जरा "बरा' म्हणता येईल अशा आवाजाचं वरदान दिलेलं. कष्ट करून घेणारे आई-वडील, तेव्हा जागोजागी होणाऱ्या संगीत कार्यक्रमांना जाण्याची मिळालेली संधी, प्राथमिक शाळेतील संगीतवेडे जागरूक संगीत शिक्षक आगाशे सर, वेळोवेळी स्पर्धांमधून व कार्यक्रमांमधून गायला मिळालेल्या संधी, गुरुकृपा आणि परमेश्‍वरी कृपा या सगळ्यांमुळंच मी गाण्याचा आनंद घेऊ आणि देऊ शकते.

वसंतरावांकडचा सकाळचा नऊचा क्‍लास आठवतोय. मला पोचायला 2-3 मिनिटं उशीर झाला असावा. सर त्यांच्या गादीवर तक्‍त्याला टेकून बसलेले. पांढरं शुभ्र धोतर, पांढरा झब्बा, व्यवस्थित विंचरलेले कुरळे केस. समोरच्या तबकात तंबाखू, सुपारी, विड्याची पानं, सरांच्या अंगठ्याच्या नखात चुना, डाव्या हातात तळहातावर तंबाखू. मला पाहताच चेहऱ्यावर नाराजी. मला म्हणाले, ""घड्याळात पाहतेस ना किती वाजले?'' मी- ""पण सर..'' ""बस.. उशिरा आली.'' सर - ""ख्यालाच्या आवर्तनामध्ये दुसऱ्या मात्रेवर समेवर येऊन चालेल का? वेळेचं भान नको का ठेवायला?'' ताल म्हणजे काय, आवर्तन म्हणजे काय, याचा मिळालेला पहिला धडा होता तो. असे शिस्तप्रिय, वक्तशीर, मितभाषी, आतून खूप प्रेम करणारे, वरवर कोरडे वाटणारे सर.

त्यांच्याकडची बारा वर्षं अतिशय शिस्तबद्ध, तालमीत गेली. गुरुकुल पद्धतीतून बाहेर पडली होती संगीत शिक्षण पद्धत. तो काळ होता "क्‍लासिकल' संगीत शिक्षणाचा, म्हणजे क्‍लासमध्ये जाऊन शिकण्याचा. सरांच्या क्‍लासला अनेक दिग्गज कलाकार येत असत. अभिषेकी बुवा, माणिकताई वर्मा, पं. सी. आर. व्यास वगैरे. आमचा गुरुपौर्णिमेचा उत्सवही दणक्‍यात होत असे. मोठमोठे गायक आमची गाणी ऐकायला येत असत. प्रोत्साहन देत, कौतुक करत व वेळोवेळी मार्गदर्शनही करत. माणिकबाईंनी बुद्धिमत्तेचं गाणं सहज व गोड करून कसं गायचं ते सांगितलं. अभिषेकीबुवांनी सोपे हृदयस्पर्शी सूर कसे लावायचे, उत्कटता, स्वरभाव, स्वराचा लगाव काळीज पिळवटणाऱ्या स्वराकृती हे सगळं दाखवून दिलं. व्यासबुवांकडून रागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, रागविचार, आकर्षक बंदिशी हे शिकलो. प्रत्येक क्षण मला खरं तर काहीतरी शिकवून गेला, अजूनही शिकवत असतो.
आता मला लक्षात येतं, की माझ्या शिष्यांकडूनही मी शिकत असते.

किशोरीताईंकडे चाललेला यमन मनात रुंजी घालतोय, समोर दिसतोय, दरवळतोय, जिभेवरदेखील यमनचीच चव रेंगाळतेय. केवळ त्या आठवणींनी मन जणू यमनच झालंय. ताईंकडे यमनची तालीम चाललेली असतानादेखील असंच वाटायचं, मीच यमन झाल्यासारखं. सगळं जग यमन झाल्यासारखं वाटे. त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतरदेखील यमनमध्ये तरंगल्याचा आभास होई. अंतर्मनामध्ये यमनच चालू असे. ताई म्हणत, ""रागाला शरण जा, तोच तुम्हाला वाट दाखवेल.'' ताईंचा श्‍वास म्हणजेच संगीत. संगीत हेच जीवन. त्यांची गुरूवर अपार भक्ती. गुरू म्हणजे त्यांचीच आई- गानतपस्विनी - "मोगूबाई.' ताईंनी शिस्तबद्ध गायकी पचवून आपली स्वयंभू, स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. रागाचं विशाल रूप त्यांना दिसलं आणि आम्हालाही त्याची अनुभूती दिली. मी स्वत: यमन होते तेव्हा काय घडत असतं, याचा साक्षात्कार करवला.

यश म्हणजे काय? पैसा, नाव, कीर्ती मिळवणं म्हणजे यश; मनातली स्वप्न पूर्ण होणं म्हणजे यश; की श्रोत्यांना भावविभोर करणं म्हणजे यश? चांगला माणूस बनणं म्हणजे यश की यशस्वी कलाकार होणं म्हणजे यश? निरंतर साधनेत रमणारं मन घडवणं म्हणजे यश, की सातासमुद्रापलीकडे कार्यक्रम करणं म्हणजे यश? या विचारांच्या भोवऱ्यात मन भरकटत असताना आठवतो तो माझ्या गुरूंबरोबर गायलेला राग भैरव. पं. दिनकर कायकिणी- आग्रा घराण्याचे अध्वर्यू- त्यांनी भैरव शिकवला. खरं तर उभाच केला डोळ्यांसमोर. राग ही केवळ एक स्वराकृती नसून, तरल भावाचं एक वलय आहे. अलगद तरंगणारं, गायकाच्या आणि श्रोत्याच्या तरल मनाला तरंगवणारं. पं. कायकिणी गुरुजींची काही वाक्‍यं इथं आठवतात-
"शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नसून आत्मरंजनासाठी आहे.'
"भारतीय संगीत हे दोन स्वरांना जोडणाऱ्या दुव्यात दडलेलं आहे.'
मागं वळून पाहताना वाटतं, शिस्तप्रिय, कडक स्वभावाच्या माझ्या वडिलांनी माझा रियाझ करून घेतला नसता, तर मी गायिका झाले असते का? साधना सरगमसारखी गायिका अनेक स्पर्धांमध्ये माझी प्रतिस्पर्धी नसती, तर मला स्फूर्ती कोठून मिळाली असती? वेळोवेळी मिळालेल्या संधी हेच यशाचं रहस्य नाही का?

मी दहावीत असताना श्रीधर फडक्‍यांनी दूरदर्शनवर एक गाणं गाण्यासाठी बोलावलं. संगीतकार म्हणून त्यांचाही सुरवातीचाच काळ. शब्दप्रधान गायकीकडे मी डोळसपणे पाहू लागल्याचं आठवतंय. आपला आवाज माईकमार्फत कसा पोचतोय याची जाणीव झाल्याचं आठवतंय. शब्दोच्चार, आवाजाचा लगाव, श्‍वास घेण्याच्या जागा, शब्दांना न्याय देणं, संगीतकाराच्या स्वराकृतीला न्याय देणं आणि या सगळ्या पलीकडे जाऊन त्या गाण्यावर आपला ठसा उमटवणं म्हणजे काय, याचा तेव्हा शोध घेऊ लागले.

अकरा वर्षांची असतानाची एक स्पर्धा आठवतेय. मुंबईतल्या शिवाजी पार्कमधील वनिता समाजाचा हॉल गच्च भरलेला. परीक्षक होते सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे. साधना सरगम गायला बसली. भरपूर आत्मविश्‍वास, सुमधुर गळा, उत्तम तयारी, यामुळं तिचं गाणं बहारदार झालं. पहिला नंबर हिचाच येणार, अशी सगळ्यांची खात्री झाली. यापेक्षा चांगलं गाणं या व्यासपीठावर आजतरी होणं शक्‍य नाही, असंही वाटत होतं. आणि माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जाऊन बसले. प्रचंड दडपण जाणवत होतं. समोर बसलेले दिग्गज, साधनाच्या गाण्यानं तयार झालेलं वातावरण यामुळं स्फुरण चढल्यासारखं वाटू लागलं. दडपणातून आत्मविश्‍वास वाट काढू लागला. काही क्षणांतच मला समोरचे श्रोतेदेखील दिसेनासे झाले. नजरेसमोर केवळ माझं गाणं, त्यातला भाव दिसू लागला. परमेश्‍वरावर विश्‍वास ठेवल्याचं फळ मला मिळतंय असं वाटू लागलं. सकारात्मक दृष्टिकोनाचं महत्त्व कळलं. माझं सादरीकरणदेखील उत्तम झालं. चांगली स्पर्धा आपल्याला सशक्त बनवते, याचा प्रत्यय आला. प्रतिस्पर्धी जितका चांगला, तेवढं मोठं आव्हान. प्रतिस्पर्धी हादेखील गुरूच नाही का? या प्रसंगात माझा नंबर पहिला आला, हे मला इथं महत्त्वाचं वाटत नाही. अनेक स्पर्धांमध्ये कधी साधनाचा पहिला, तर कधी माझा पहिला येत असे; परंतु, महत्त्वाचं हे वाटतं, की साधना जितका आपल्या गाण्याचा दर्जा उंचावत असे, तेवढंच मोठं आव्हान ती माझ्यासमोर ठेवत असे. आणि माझ्या क्षमतेचं, कुवतीचं इलॅस्टिक ताणण्याची शक्ती माझ्यात निर्माण करत असे.

आज साधना चित्रपट संगीतातील आघाडीची गायिका आहे. मला चित्रपटात गायला मिळालेली पहिली संधी शाम बेनेगलांच्या "सरदारी बेगम' या चित्रपटातील. गायिकेच्या जीवनावरचा चित्रपट होता. स्टुडिओत शामबाबू, संगीतकार वनराज भाटिया, त्यांचे असिस्टंट अशोक पत्की, गीतकार जावेद अख्तर. शामबाबूंनी चित्रपटातील प्रसंग वर्णन करून सांगितला. जावेदजींनी थोड्याच वेळात गाणं लिहिलं. अशोकजींनी चाल दिली. तिथंच मला गाणं शिकवलं. संगतकारांना मधले म्युझिक पिसेस, ठेका समजावून सांगितला. पाच-सहा वेळा रिहर्सल झाली. गाणं रेकॉर्ड होऊन तयार. या सगळ्याला लागलेला वेळ केवळ तीन तास. या रेकॉर्डिंगमध्ये मला प्रचंड शिकायला मिळालं. शामबाबूंनी एका गाण्यासाठी मला बोलावलं होतं आणि त्या चित्रपटातील जवळ-जवळ आठ गाणी मी गायिले. हे रेकॉर्डिंग चालू असताना आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस स्टुडिओत साजरा झाला. सरप्राईझ गिफ्ट घेऊन स्टुडिओच्या दरवाजात उभा असलेला उदय (टिकेकर) आठवतोय आणि आठवत आहेत कॉलेजचे दिवस.

दहावीत बरे मार्क मिळाले होते. बाबा रियाझाच्या मागे असत आणि आई अभ्यासाच्या. चांगले मार्क मिळाले नसते तरच नवल म्हणा. पोदार कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. अभ्यास, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा सुरू झाल्या. काही वर्षांतच उदयची ओळख झाली. तबला वाजवत असे तो. अभिनयातही निपुण. दिलदार, देखणा, मनमिळावू, काहीसा रागीट. आमचे सूर जुळू लागले. माझ्या गाण्याला तो ठेका धरू लागला. गायनात जसं साथीला महत्त्व, तसंच जीवनातदेखील - संगतकार ठीक नसला, तर कार्यक्रम फसलाच म्हणून समजा.

आपला छंद हा आपला व्यवसाय होण्यासारखा दुसरा आनंद नाही. मी जेव्हा गाणं शिकायला सुरवात केली, तेव्हा त्याचं व्यवसायात रूपांतर होईल किंवा व्हावं अशी कोणतीही योजना मनात नव्हती. केवळ गाण्यासाठी गाणं होतं. जसजसा अनुभव मिळत गेला, गुरूंकडून तालीम मिळत गेली, साधनेत आनंद मिळू लागला, तशी बाहेरून गाण्यासाठी आमंत्रणं येऊ लागली. एखाद्या रागाचा केलेला अभ्यास, विचार, मिळालेली अनुभूती आणि त्याप्रत श्रोत्यांना घेऊन जाणं, आपल्या आनंदात त्यांना समाविष्ट करून घेणं, आपल्या अनुभूतीचा अनुभव त्यांना देणं, गायनात साधलेली मनोअवस्था आणि श्रोत्यांची मनोअवस्था एकाकार होणं, हेच मैफलीच्या यशाचं रहस्य असू शकेल का? गायकासाठी सगळ्यात महत्त्वाचा श्रोता म्हणजे तो स्वत:. स्वत:ला संतुष्ट करणं महत्त्वाचं आणि महाकठीणदेखील. कारण हा आपल्यातला श्रोता आपली क्षमता पूर्णपणे जाणणारा आणि याच्या वरची पायरी म्हणजे स्वत:ला विसरून जाऊन गाणं. स्वत:तल्या गायकालाही आणि श्रोत्यालाही. संगीताला संपूर्ण शरणागती. आपणच संगीत होऊन जाणं. जिथं गायक उरत नाही, श्रोता उरत नाही, उरतं ते केवळ संगीत.

अमेरिकेच्या दौऱ्यातील एक प्रसंग आठवतोय- अटलांटा शहरात संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होता. मी आणि माझे साथीदार तयार होऊन गाडीत बसलो. चार वाजले होते. गप्पा मारता मारता अचानक समोरची गाडी आमच्या गाडीवर येऊन आदळली. आमच्या गाडीला अपघात झाला. तसं कोणालाही जास्त लागलं नाही; परंतु सगळे मनातून घाबरलेले. कोणाला किती लागलंय याचा अंदाज येईना. गाडी परत चालू होणं अशक्‍य होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी श्रोते जमू लागले होते. आणि अमेरिकेत तर अगदी 100-200 किलोमीटर दूरवरूनदेखील श्रोते येतात. थोड्याच वेळात दुसरी गाडी आली. आम्ही त्या गाडीत बसून कार्यक्रमाच्या ठिकाणी साडेसहाला पोचून थेट रंगमंचावर जाऊन बसलो. दहा मिनिटांत गायला सुरवात केली. तानपुरा वाजायला सुरवात झाली, की एक वेगळं स्फुरण चढतं. आम्ही अपघात पूर्णपणे विसरलो, नादब्रह्मात बुडालो; मात्र दुसऱ्या दिवशी अंग ठणकू लागलं आणि अपघाताची आठवण करून देऊ लागलं.

याच दौऱ्यामधला शेवटचा कार्यक्रम होता. विमान उशिरा पोचल्यानं आम्ही तयार होऊन थेट रंगमंचावरच पोचलो. श्रोत्यांनी भरलेलं सभागृह, साथीदारांनी आपली वाद्यं बॅगांमधून काढली. हार्मोनिअम काढली, तानपुरा काढला, तबला-डग्गाही काढला. पाहतो तर काय, डग्गा फुटला होता. दोन मिनिटांत कार्यक्रम सुरू करायचा होता. पडदा उघडलेलाच होता. श्रोत्यांनाही डग्गा फुटल्याचं लक्षात आलं. अमेरिकेच्या त्या छोट्याशा शहरात दुसरा डग्गा मिळवणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं होतं. संयोजक म्हणाले, ""तुम्ही आलापी सुरू करा, आम्ही डग्गा घेऊन येतो.'' मी जवळ जवळ 20 मिनिटं तबल्याशिवाय गायले. आणि नंतर डग्गा मिळाला. कार्यक्रम सुरळीत पार पडला.

अशा तऱ्हेनं एक गायिका म्हणून जगताना, गाताना, प्रवास करताना अनेक अनुभव आले. काही चांगले, काही बरे; वाईट नाहीच. अनुभवसंपन्न, श्रीमंत झाल्यानं प्रत्येक क्षण सुंदर वाटू लागलाय. तो पूर्णत्वानं जगावा असं वाटतं. आपल्या संवेदनांशी ओळख होते आहे. आपली ओळख पटते आहे. आपलं आपल्याशी नातं दृढ होतं आहे.

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive