Saturday, July 27, 2013

In mumbai lunch possible for Rs. 12


In mumbai lunch possible for Rs. 12

मुंबईत १२ रुपयांत जेवण शक्य!

raj babbar



तुम्हाला समजा १२ रुपये दिले आणि सांगितलं की, एवढ्या पैशांमध्ये भात, डाळ-सांबार आणि भाज्या असं जेवण करून दाखवा, तर आजच्या महागाईच्या काळात तुम्ही ते करू शकाल?... नाही ना!... पण, काँग्रेसचे प्रवक्ते राज बब्बर बहुधा हा चमत्कार करू शकतात. कारण, मुंबईत १२ रुपयांत व्यवस्थित जेवण करता येऊ शकतं, असं त्यांनी अगदी तो-यात सांगितलंय.

देशातील गरिबी घटल्याचा दवंडी पिटत काँग्रेस सरकार सध्या स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करतंय. परंतु, नियोजन आयोगानं गरिबीची व्याख्या करताना गरिबांची अक्षरशः थट्टा केली आहे. शहरांमध्ये जी व्यक्ती रोज ३३ रुपये खर्च करते, ती गरीब नसल्याचं अजब तर्कट त्यांनी मांडलंय. तर, ग्रामीण भागात २७.२० रुपये खर्च करणारी व्यक्तीही 'श्रीमंत' असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून विरोधक काँग्रेस सरकारवर तुटून पडले आहेतच, पण जनताही चांगलीच खवळलेय. आजच्या महागाईचा विचार करता एवढ्या कमी पैशांत कुणाचंच भागणार नाही, मग देशातले सगळेच श्रीमंत म्हणायचे का?, असा सवाल जनसामान्य करत आहेत. परंतु, त्याचं उत्तर देताना काँग्रेस नेते आपलंच घोडं पुढे दामटवताना दिसताहेत. तसाच प्रकार राज बब्बर यांनी केलाय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुंबईत आजही १२ रुपयांत व्यवस्थित जेवण मिळू शकतं.

देशात महागाई वाढली असली तरी गरिबी कमी झाली आहे. दर दिवशी २८ ते ३२ रुपये कमावणारी व्यक्ती दोन वेळचं पूर्ण जेवण जेवू शकते, असं मत बब्बर यांनी व्यक्त केलं. अर्थात, हे गणित कसं जमवायचं हा ज्याचा - त्याचा प्रश्न असल्याचं सांगून त्यांनी तपशिलात शिरणं सोयीस्करपणे टाळलं. आजही मुंबईसारख्या शहरामध्ये मला १२ रुपयांमध्ये संपूर्ण जेवण मिळतं. फक्त वडापाव नव्हे, तर भात, भाजी, डाळ - सांबार हे सगळं तेवढ्या रुपयांमध्ये येतं, असा दावा त्यांनी केला.

टोमॅटोच्या भावावरून गरिबीची व्याख्या करायला लागलो तर परिस्थिती कठीण होऊन बसेल. तुम्हाला शहरात टोमॅटो मिळत नसतील. मात्र गावातील गरीब लोक शेतातील टोमॅटो तोडून खाऊ शकतात. मग यात गरीब कोण आणि श्रीमंत कोण, हा प्रश्न आलाच कुठे?, असा सवाल बब्बर यांनी केला. महागाईचा प्रश्न गौण नाही, मात्र ज्याप्रमाणे महागाई वाढली आहे त्याप्रमाणे लोकांची खर्च करण्याची क्षमताही वाढली आहे. महागाईपेक्षा खर्च करण्याची क्षमता जास्त पटीने वाढल्याचं बब्बर यांनी नमूद केलं.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive