Tuesday, August 27, 2013

गेल्या वर्षांत राज्यात तब्बल ८६ सामूहिक बलात्कार



अत्याचारांचा फास्ट ट्रॅक!




गेल्या वर्षांत राज्यात तब्बल ८६ सामूहिक बलात्कार


ऑक्टोबर २००९ रोजी पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हिची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती . हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी , अशी आक्रमक मागणी त्यावेळी झाली होती . मात्र , चार वर्षे लोटली तरी या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली नाही . राज्यात गेल्या वर्षी एक - दोन नव्हे तर , तब्बल ८६ सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्यात . परंतु , त्याबाबत कुणी अवाक्षरही काढत नाही . राज्यातील अशा प्रकरणांचे अनेक खटलेही निकालांच्या प्रतीक्षेत असून बहुसंख्य प्रकरणांमधील आरोपी मोकाटच आहेत .

मुंबईतल्या सामूहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्याची आणि सरकारी वकील म्हणून अॅड . उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे . या प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेत उमटून आरोपींना फासावर लटकवण्याचीही मागणी झाली आहे . जानेवारी महिन्यांत दिल्लीतील सामूहिक बलात्काराचेही असेच तीव्र पडसाद उमटले होते . मुंबई , दिल्लीसारख्या महानगरांमध्ये होणाऱ्या अशा निर्घृण घटनांनी समाजमन व्यथित होते . सरकारही खडबडून जागे होते . परंतु , वर्षभरात महाराष्ट्रात घडलेल्या ८६ सामूहिक बालात्कारांपैकी एकाही प्रकरणात समाज किंवा सरकारने एवढी आस्था दाखवलेली नाही , हे विदारक सत्य त्यातून समोर येते . गेल्या १० वर्षात राज्यात १५ हजार बलात्काराच्या घटना घडल्या असून त्यातील किमान ४०० घटना या सामूहिक बलात्काराच्या आहेत . परंतु , खैरलांजीसारखी दोन - चार प्रकरणे वगळल्यास अन्य कुठल्याही प्रकरणाची मुंबईएवढी गंभीर दखल घेतली गेलेली नाही .

राज्यातील विविध कोर्टांमध्ये डिसेंबर , २०१२ अखेरीस निकालांच्या प्रतीक्षेत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांची संख्या होती १४ , ४१४ . ज्या प्रकरणांत कोर्टाने निकाल दिला आहे त्यापैकी ८४ टक्के आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याचे सीआयडीचा नुकताच प्रकाशित केलेला ' क्राईम इन महाराष्ट्र ' हा अहवाल सांगतो . त्यामुळे बलात्कारांच्या खटल्यांचा निकाल आणि आरोपींना शिक्षेचे प्रमाण फाससे आशादायी नसल्याचेच निष्पन्न होते


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive