पूजेसाठी आरोग्यदायी पत्री
पूजेच्या निमित्ताने या विविध वनस्पतींशी जो संपर्क येतो तो आरोग्यदायक असतो. निसर्गाशी संबंध जोडलेला राहावा, आसपासच्या वृक्षसंपदेची माहिती असावी, घराच्या आसपास कोणकोणती झाडे-वेली असाव्यात हे ज्ञात व्हावे, असे कितीतरी उद्देश पत्री गोळा करण्यामागे असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रीत अंतर्भूत असलेली प्रत्येक वनस्पती आरोग्य-रक्षणामध्ये अग्रेसर असलेली दिसते. पत्री फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त असते.
श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, तसेच पूजा-व्रत-वैकल्यांचा कालावधी. हरितालिका, नागपंचमी, मंगळागौरी अशा अनेक पूजा श्रावणात येतात. भाद्रपदातील गणेशोत्सवाचे वेधही श्रावणात लागल्यावाचून राहात नाहीत. या सर्व पूजांसाठी "पत्री' म्हणजे निरनिराळ्या वनस्पतींची पाने, फुले वापरली जातात. पूजेच्या निमित्ताने या विविध वनस्पतींशी जो संपर्क येतो तो आरोग्यदायक असतो. निसर्गाशी संबंध जोडलेला राहावा, आसपासच्या वृक्षसंपदेची माहिती असावी, घराच्या आसपास कोणकोणती झाडे-वेली असाव्यात हे ज्ञात व्हावे, असे कितीतरी उद्देश पत्री गोळा करण्यामागे असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रीत अंतर्भूत असलेली प्रत्येक वनस्पती आरोग्य-रक्षणामध्ये अग्रेसर असलेली दिसते. आज आपण श्रावणात वापरल्या जाणाऱ्या पत्रींची माहिती करून घेऊ या.
श्रावणातील पत्री
अशोकाची पाने
शोभेचा उंच वाढत जाणारा अशोक हा खरा अशोक नव्हे. सीतेचा अशोक हा खरा अशोक. पत्री म्हणून तसेच औषधात सीतेचा अशोक वापरला जातो. अशोक स्त्रीत्वाचे रक्षण करणारा, स्त्रीसंतुलन करणारा असतो. गर्भाशय, बीजाशयासंबंधित अनेक विकारांवर आयुर्वेदात सीतेच्या अशोकाचा उपयोग केला जातो.
आवळ्याची पाने
दूर्वा
कण्हेर
कदंब
ब्राह्मी
धोत्रा
धोत्र्याची फुले
धोत्रा अर्पण करणे धनदायी असते. धोत्र्याचे पंचांग (मूल, फळ, साल, मूळ व पाने) एकत्र करून धुरी घेण्याने खोकला बरा होतो. धोत्र्याच्या फुलांना मादक गंध असतो.
आघाडा
बेल
गंध फुलांचा...
चाफ्याची फुले
केवडा
केवड्याचे फूल अर्पण करण्याने बुद्धी वाढते, असे सांगितले आहे. अपस्मारावर केवड्याची फुले व केवड्याच्या कणसावरील बारीक कण एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचे नस्य घ्यायला सांगितले आहे. केवड्याच्या पारंब्या बलकर, देहाला दृढ करणाऱ्या व रसायनगुणांनी युक्त असतात.
कण्हेर फुले
कण्हेरीची फुले वाहण्याने स्त्रीत्वाचे रक्षण होते. कण्हेरीचे मूळ विषारी असते. दंशावर पांढऱ्या कण्हेरीचे मूळ उगाळून लावले असता विष उतरते. पांढऱ्या कण्हेरीची फुले वाळवून त्यांचे नस्य करण्यानेही सापाचे विष उतरते. नागीण उठते त्यावर लाल कण्हेरीची फुले व तांदूळ पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी वाटून लेप करता येतो.
बकुळ फुले
सुगंधी, छोटी-छोटी बकुळ फुले वाहण्याने स्त्रीच्या तारुण्याचे, स्त्रीत्वाचे रक्षण होते. आयुर्वेदातही बकुळीची ताजी फुले, बदाम व खडीसाखर यांचे मिश्रण तीन दिवस घेण्याने पाळीच्या वेळचा अतिरक्तस्राव किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे वगैरे त्रास दूर होतात असे सांगितले आहे. बकुळीच्या फुलांचा वास घेण्याने हृदयाची ताकद वाढते.
कमळ
कमळ वाहण्याने शत्रूचा नाश होतो. कमळाचे फूल सुगंधी, वर्णकर, शीतल व रक्तदोष बरा करणारे असते. पांढऱ्या कमळाच्या पाकळ्या, ज्येष्ठमध व खडीसाखर यांचा थंड काढा पिण्याने पित्तामुळे आलेला ताप बरा होतो.
गुलाब
सुगंधी गुलाब वाहण्याने शांती प्रस्थापित होते. गुलाब सौम्य, थंड व रक्तशुद्धी करणारा असतो. गुलाबाच्या वाळलेल्या कळ्या साखरेसह खाऊन वर पाणी पिण्याने पोट साफ होते. गुलकंद हे प्रसिद्ध औषध गुलाबाच्या फुलांपासून बनवितात व ते पित्तशमनासाठी तसेच मलशुद्धीसाठी उत्तम असते.
जास्वंद
जास्वंदाची फुले वाहण्याने लोकसंग्रह वाढतो. जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावली असता केसांची वाढ होते व केस काळे होतात. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो.
मोगऱ्याची फुले
मोगऱ्याची सुगंधी फुले सर्वांच्या परिचयाची असतात. ही वाहण्याने परमात्मप्राप्ती होते असे शास्त्र सांगते. मोगऱ्याचे फूल गुणाने थंड, सुखप्रद व पित्तशामक असते. मोगऱ्याची पाने गर्भिणीच्या अंगावरून पांढरे पाणी जाते त्यावर उपयोगी असतात.
अशोकाची फुले
स्त्रीत्वरक्षक, गर्भाशयशुद्धीकर आहेत. स्त्रियांचा शोक नाहीसा करण्याचा विशेष गुणधर्म अशोकाच्या फुलांमध्ये असतो. या प्रकारे पत्री फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त असते. देवदेवतांना वाहण्याच्या निमित्ताने पत्रींची ओळख झाली, संपर्क कायम राहिला तर आवश्यकतेनुसार त्यांचा आरोग्यरक्षणासाठी फायदा करून घेता येईल.
32
5
फोटो गॅलरी
No comments:
Post a Comment