स्वच्छंद प्रवास आणि लोककथांचा अनुवाद
Tour and Translation Folk Tales
कर्नाटकातल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या परिसरातल्या लोककथांचं संशोधन-संकलन केलं आहे. माझ्याकडून तत्परतेनं या लोककथांची निवड होईल आणि एखाद्या नियतकालिकातून मी त्या प्रकाशितही करू शकेन असं वाटलं होतं! पण वेगवेगळी कामं येत राहिली. त्यामुळे हे काम राहूनच जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे... सांगत आहेत प्रसिध्द अनुवादक
> डॉ. उमा वि. कुलकर्णी
आयुष्यात मनात आलेलं सगळं आपल्याला मिळेलच, अशा मानसिकतेत जगणाऱ्या पिढीपैकी मी नसल्यामुळे आयुष्यात काय राहून गेलंय असं आवर्जून आठवूनच बघावं लागेल. प्रथमदर्शनी तर असंच जाणवतं की अनुवाद क्षेत्रात एखाद-दुसरा अनुवाद करून, साहित्य-क्षेत्रात काही ना काही केल्याचं समाधान मिळवत आयुष्य काढता येईल असं वाटत असताना या क्षेत्रात जे काही करायला मिळालं आणि मिळतंय हेच भरपूर आहे.
तरीही अगदी बारीकसे काही कोपरे असतातच. अशा कोपऱ्यांविषयी असमाधान बागळत आयुष्यभर ते कुरवाळणं काही योग्य नसलं तरी, या लेखाच्या निमित्तानं त्यांच्याकडे एक नजर टाकता येईल एवढं खरं!
अगदी लहानपणापासून मला प्रवासाची अपरिमित हौस. इतकी की त्या वेळी मला भटक्या जमातीचा हेवा वाटायचा. (पुढे त्यांची आत्मचरित्रं वाचून त्यांच्या अडचणीही समजल्या म्हणा!) घरी आलेले पाहुणे जायला निघाले की त्यांच्याबरोबर आपणही जावं असं वाटायचं. सात भावंडांपैकी एक असल्यामुळे उगाच गंमतीसाठी प्रवास. हे प्रकरण तेव्हा नव्हतंच. तरीही वर्षाकाठी उसाचं गुऱ्हाळ असेल तेव्हा आम्ही सगळे आमच्या गावी बेडकीहाळला जात असू. तिथं 'कोडीच्या मळ्यावर गुऱ्हाळासाठी जाण्यासाठी आवर्जून बैलगाडी सांगितलेली असे.
त्यातही बैलगाडीनं बेडकीहाळ ने नरसोबावाडी असा जो प्रवास होई तो आजही माझ्या स्मरणात आहे. पहाटे अडीच-तीनला उठायचं आणि दोन बैलगाड्या जुंपून प्रवासाला निघायचं. त्यातली बायका-मुलांसाठीच्या गाडीला सवारी बांधलेली असे. या दोनही बैलगाड्यांची बोरगावच्या खडकाळ माळावर शर्यत लावली जायची. आजही मला आठवणारी कडाक्याच्या थंडीची आठवण इथलीच आहे. माझ्या जीवनातील पराकोटीची थंडी मी भल्या पहाटे अनवाणी, पायी दूधगंगा नदी ओलांडताना आणि त्या नंतर अनवाणी गोट्या-वाळूवरून कसं-बसं धावत जाऊन पुन्हा बैलगाडीत बसेपर्यंत अनुभवली आहे! त्यानंतर आम्ही हिमालयात प्रवास केला. गंगोत्रीला गोमुखापर्यंत जाऊन आलो. अगदी नथुला पासला बर्फवर्षावही अनुभवला. पण मला आजही थंडी म्हटली की तीच थंडी आणि तळपायांना टोचणारे ते नदीकाठचे गोटे आठवतात.
त्यानंतर मात्र आम्हाला गावाकडं टॅक्सीनं नेण्यात येऊ लागलं. प्रवास सुखाचा होऊ लागला आणि बैलगाडीची ती मजा कायमची आठवणीपुरतीच राहिली. तेवढी थंडीही कधी वाजली नाही.
तसा आम्ही पुढच्या आयुष्यातही बराच प्रवास केला. माझे मिस्टर विरुपाक्ष सरकारी नोकरीत असताना दर चार वर्षांनी आम्ही बाहेर पडायचोच. शिवाय माझा प्रबंधाचा विषय 'दविड देवालये हा असल्यामुळे त्याही निमित्तानं दक्षिण भारताचा प्रवास झाला. अनुवादाच्या गरजेनुसार आम्ही कर्नाटकाच्या विविध भागात फिरत असतो. मागं आमची विजय-सुपर होती. तिच्यावरूनही मुंंबई-महाबळेश्वर अशी खूप भटकंती केली. विरूपाक्षांच्या रिटायरमेंटनंतर १९९० साली आम्ही भुसावळजवळच्या वरणगावहून पुण्यालाही तिच्यावरून आलो होतो; आमचा मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबरही खूप हिंडलो. अजूनही हिंडत असतो. तरीही... तरीही.
माझ्या मनातलं एक प्रवासाचं स्वप्न आहे. काहीही न ठरवता एक गाडी घेऊन प्रवासासाठी बाहेर पडायचं. मनाला येईल तिथं मुक्काम करायचा. शक्यतो बरोबर तंबू न्यायचा. गावाबाहेर मुक्काम करायचा आणि काही महिने फिरून जेव्हा घराची तीव्रपणे आठवण येईल तेव्हाच घरी परतायचं! अक्षरश: कुठल्या दिशेनं जायचं तेही आयत्या वेळी ठरवायचं. घरी परतल्यावरही 'आपण काय पाहिलं? याचा विचार करायचा नाही. अशी काहीशी माझी अपेक्षा आहे. फक्त सीझन चांगला बघायचा आणि कमी पडणार नाहीत इतके पैसे बरोबर घ्यायचे, भरपूर खायला घ्यायचं.... बस्स!
तशीच आणखी एक इच्छा म्हणजे दिवसच्या दिवस जंगलात काढून तिथल्या प्राण्यांबरोबर रमायचं! भरपूर फोटो काढायचे. ('डिस्कव्हरी चॅनेल बघ त्या पेक्षा असा काहीजण यावर सल्ला देतील. तरीही)
या दोन्ही इच्छा राहून गेल्या आहेत, असंच मी आता तरी मनाते. कारण असा प्रवास करायला आवश्यक असलेला निवांतपणा आता मिळत नाही आणि शरीराची साथ मिळेल याचीही खात्री वाटत नाही.
अजूनही आम्ही प्रवास करत असलो तरी, अशा प्रकारचा प्रवास म्हणजे एक केवळ स्वप्नच असेल. हेही समजायचं वय असल्यामुळे त्याबद्दल खंतही नाही. एक मात्र खरं, भारतातच बघायला खूप आहे असा अनुभव असल्यामुळे परदेश प्रवासाची मात्र अजिबात अपेक्षा नाही.
राहून गेलेली आणखी एक गोष्ट लेखनाविषयीची आहे.
अनुवादाच्या सुरुवातीला मला कारंतांची एक कादंबरी अनुवादित करायची होती. जेव्हा आम्ही परवानगीसाठी कारंतांना विचारलं तेव्हा, त्याचा अनुवाद आणखी कुणी करत असल्याचं समजलं. नंतर मराठीमध्ये ती कादंबरी 'मृत्यूनंतर' या नावानं आलीही. त्यात कारंतांनी कादंबरीच्या माध्यमातून त्यांचं मृृत्युत्तर जीवनाविषयी असलेलं चिंतन मांडलं आहे. 'माणूस जिवंत असेपर्यंत कसा जगतो ते महत्त्वाचं; त्याच्या त्या जगण्यानुसार माणसं त्याची भल्या-बुऱ्या कारणानं आठवण काढतात, हे जितकी वर्ष राहील तेच खरं तर मृत्यूत्तर जीवन असा गंभीर विचार मांडणारी ही कादंबरी आहे. ती अनुवादित करायला मला मिळाली असती तर, मला हवी होती. पण नाही मिळाली. एका कादंबरीचे दोन अनुवाद होऊ नयेत असंही नाही. तरीही राहून गेलं हे मात्र खरं.
त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मला कारंतांचे विचार व्यक्त करणारं पुस्तक ('कारंत-चिंतन' हे मी दिलेलं नाव) अनुवादित करायला मिळाल्यामुळे ही खंत काहीशी कमी झाली आहे.
हा अनुवाद करायची मला संधी मिळाली नसली तरी, ती कादंबरी मराठीत उपलब्ध आहे; ही गोष्ट तरी बरी आहे. पण दुसरी खंत मात्र तशी नाही.
लोककथा हा माझ्या अतिशय आस्थेचा विषय आहे. आधुनिक कन्नड साहित्याचा अनुवाद करतानाही त्या मला वेळोवेळी भेटत असतात. अगदी छोटीशी लोककथाही खूप काही सांगून जाते. मराठी साहित्यात मला त्यांचा अभाव फार जाणवला. कन्नडमधला यावनूर महादेव यांच्यासारखा दलित लेखकही आपल्या कथा-कादंबऱ्यांत ती परंपरा सोडत नाही. तसंच तिथला नाटक हा कला-प्रकारही त्याभोवती अनेकदा फिरताना दिसतो. तो एकीकडे स्थानिक पातळीवर असतो तर, दुसरीकडे सार्वत्रिकही असतो. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या जिवंत संगीतामुळे जे चैतन्य रंगमंचावर उसळतं ते तर अद्भुत असतं. तिथली बी. जयश्ाीसारखी दिग्दशिर्का याचा प्रभावीपणे वापर करते. गिरीश कार्नाड आणि चंदशेखर कंबार यांच्यासारखे नाटककार एकच लोककथा ऐकून दोन-दोन प्रभावी नाटकं लिहितात... असो.
काही वर्षांपूवीर् डॉ. एम. एम. कुलबुगीर् यांच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कर्नाटकातल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या परिसरातल्या लोककथांचं संशोधन आणि संकलन केलं आहे. (इतरही कलांचं तिथं संशोधक-संकलन चालतं) डॉ. कलबुगीर् हे कन्नड भाषेला वाहिलेल्या हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू असल्यामुळे त्यांनी स्वत:च्या संग्रहातले या विषयावरचे ग्रंथ आम्हाला लगोलग काढून दिले. त्या वेळी मला वाटलं. माझ्याकडून तत्परतेनं या लोककथांची निवड होईल आणि एखाद्या नियतकालिकातून मी त्या नियमितपणे प्रकाशितही करू शकेन!
पण त्याच वेळी आम्हा दोघांच्याही हातात वेगवेगळी कामं येत राहिली. (विरूपाक्षही मराठी आणि इंग्लिशमधलं साहित्य कन्नडमध्ये अनुवादित करत असतात.) अजूनही तो ओघ कायम आहे आणि वयोपरत्वे तासन्तास काम करण्याबरोबर जास्तीचं वाचन काढण्यासाठी वेळही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे यानंतर हे काम राहूनच जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे.
तसं हे काम कायमचं राहून गेलं, तर मात्र मला हुरहूर वाटल्याशिवाय राहणार नाही!
Tour and Translation Folk Tales
कर्नाटकातल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या परिसरातल्या लोककथांचं संशोधन-संकलन केलं आहे. माझ्याकडून तत्परतेनं या लोककथांची निवड होईल आणि एखाद्या नियतकालिकातून मी त्या प्रकाशितही करू शकेन असं वाटलं होतं! पण वेगवेगळी कामं येत राहिली. त्यामुळे हे काम राहूनच जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे... सांगत आहेत प्रसिध्द अनुवादक
> डॉ. उमा वि. कुलकर्णी
आयुष्यात मनात आलेलं सगळं आपल्याला मिळेलच, अशा मानसिकतेत जगणाऱ्या पिढीपैकी मी नसल्यामुळे आयुष्यात काय राहून गेलंय असं आवर्जून आठवूनच बघावं लागेल. प्रथमदर्शनी तर असंच जाणवतं की अनुवाद क्षेत्रात एखाद-दुसरा अनुवाद करून, साहित्य-क्षेत्रात काही ना काही केल्याचं समाधान मिळवत आयुष्य काढता येईल असं वाटत असताना या क्षेत्रात जे काही करायला मिळालं आणि मिळतंय हेच भरपूर आहे.
तरीही अगदी बारीकसे काही कोपरे असतातच. अशा कोपऱ्यांविषयी असमाधान बागळत आयुष्यभर ते कुरवाळणं काही योग्य नसलं तरी, या लेखाच्या निमित्तानं त्यांच्याकडे एक नजर टाकता येईल एवढं खरं!
अगदी लहानपणापासून मला प्रवासाची अपरिमित हौस. इतकी की त्या वेळी मला भटक्या जमातीचा हेवा वाटायचा. (पुढे त्यांची आत्मचरित्रं वाचून त्यांच्या अडचणीही समजल्या म्हणा!) घरी आलेले पाहुणे जायला निघाले की त्यांच्याबरोबर आपणही जावं असं वाटायचं. सात भावंडांपैकी एक असल्यामुळे उगाच गंमतीसाठी प्रवास. हे प्रकरण तेव्हा नव्हतंच. तरीही वर्षाकाठी उसाचं गुऱ्हाळ असेल तेव्हा आम्ही सगळे आमच्या गावी बेडकीहाळला जात असू. तिथं 'कोडीच्या मळ्यावर गुऱ्हाळासाठी जाण्यासाठी आवर्जून बैलगाडी सांगितलेली असे.
त्यातही बैलगाडीनं बेडकीहाळ ने नरसोबावाडी असा जो प्रवास होई तो आजही माझ्या स्मरणात आहे. पहाटे अडीच-तीनला उठायचं आणि दोन बैलगाड्या जुंपून प्रवासाला निघायचं. त्यातली बायका-मुलांसाठीच्या गाडीला सवारी बांधलेली असे. या दोनही बैलगाड्यांची बोरगावच्या खडकाळ माळावर शर्यत लावली जायची. आजही मला आठवणारी कडाक्याच्या थंडीची आठवण इथलीच आहे. माझ्या जीवनातील पराकोटीची थंडी मी भल्या पहाटे अनवाणी, पायी दूधगंगा नदी ओलांडताना आणि त्या नंतर अनवाणी गोट्या-वाळूवरून कसं-बसं धावत जाऊन पुन्हा बैलगाडीत बसेपर्यंत अनुभवली आहे! त्यानंतर आम्ही हिमालयात प्रवास केला. गंगोत्रीला गोमुखापर्यंत जाऊन आलो. अगदी नथुला पासला बर्फवर्षावही अनुभवला. पण मला आजही थंडी म्हटली की तीच थंडी आणि तळपायांना टोचणारे ते नदीकाठचे गोटे आठवतात.
त्यानंतर मात्र आम्हाला गावाकडं टॅक्सीनं नेण्यात येऊ लागलं. प्रवास सुखाचा होऊ लागला आणि बैलगाडीची ती मजा कायमची आठवणीपुरतीच राहिली. तेवढी थंडीही कधी वाजली नाही.
तसा आम्ही पुढच्या आयुष्यातही बराच प्रवास केला. माझे मिस्टर विरुपाक्ष सरकारी नोकरीत असताना दर चार वर्षांनी आम्ही बाहेर पडायचोच. शिवाय माझा प्रबंधाचा विषय 'दविड देवालये हा असल्यामुळे त्याही निमित्तानं दक्षिण भारताचा प्रवास झाला. अनुवादाच्या गरजेनुसार आम्ही कर्नाटकाच्या विविध भागात फिरत असतो. मागं आमची विजय-सुपर होती. तिच्यावरूनही मुंंबई-महाबळेश्वर अशी खूप भटकंती केली. विरूपाक्षांच्या रिटायरमेंटनंतर १९९० साली आम्ही भुसावळजवळच्या वरणगावहून पुण्यालाही तिच्यावरून आलो होतो; आमचा मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबरही खूप हिंडलो. अजूनही हिंडत असतो. तरीही... तरीही.
माझ्या मनातलं एक प्रवासाचं स्वप्न आहे. काहीही न ठरवता एक गाडी घेऊन प्रवासासाठी बाहेर पडायचं. मनाला येईल तिथं मुक्काम करायचा. शक्यतो बरोबर तंबू न्यायचा. गावाबाहेर मुक्काम करायचा आणि काही महिने फिरून जेव्हा घराची तीव्रपणे आठवण येईल तेव्हाच घरी परतायचं! अक्षरश: कुठल्या दिशेनं जायचं तेही आयत्या वेळी ठरवायचं. घरी परतल्यावरही 'आपण काय पाहिलं? याचा विचार करायचा नाही. अशी काहीशी माझी अपेक्षा आहे. फक्त सीझन चांगला बघायचा आणि कमी पडणार नाहीत इतके पैसे बरोबर घ्यायचे, भरपूर खायला घ्यायचं.... बस्स!
तशीच आणखी एक इच्छा म्हणजे दिवसच्या दिवस जंगलात काढून तिथल्या प्राण्यांबरोबर रमायचं! भरपूर फोटो काढायचे. ('डिस्कव्हरी चॅनेल बघ त्या पेक्षा असा काहीजण यावर सल्ला देतील. तरीही)
या दोन्ही इच्छा राहून गेल्या आहेत, असंच मी आता तरी मनाते. कारण असा प्रवास करायला आवश्यक असलेला निवांतपणा आता मिळत नाही आणि शरीराची साथ मिळेल याचीही खात्री वाटत नाही.
अजूनही आम्ही प्रवास करत असलो तरी, अशा प्रकारचा प्रवास म्हणजे एक केवळ स्वप्नच असेल. हेही समजायचं वय असल्यामुळे त्याबद्दल खंतही नाही. एक मात्र खरं, भारतातच बघायला खूप आहे असा अनुभव असल्यामुळे परदेश प्रवासाची मात्र अजिबात अपेक्षा नाही.
राहून गेलेली आणखी एक गोष्ट लेखनाविषयीची आहे.
अनुवादाच्या सुरुवातीला मला कारंतांची एक कादंबरी अनुवादित करायची होती. जेव्हा आम्ही परवानगीसाठी कारंतांना विचारलं तेव्हा, त्याचा अनुवाद आणखी कुणी करत असल्याचं समजलं. नंतर मराठीमध्ये ती कादंबरी 'मृत्यूनंतर' या नावानं आलीही. त्यात कारंतांनी कादंबरीच्या माध्यमातून त्यांचं मृृत्युत्तर जीवनाविषयी असलेलं चिंतन मांडलं आहे. 'माणूस जिवंत असेपर्यंत कसा जगतो ते महत्त्वाचं; त्याच्या त्या जगण्यानुसार माणसं त्याची भल्या-बुऱ्या कारणानं आठवण काढतात, हे जितकी वर्ष राहील तेच खरं तर मृत्यूत्तर जीवन असा गंभीर विचार मांडणारी ही कादंबरी आहे. ती अनुवादित करायला मला मिळाली असती तर, मला हवी होती. पण नाही मिळाली. एका कादंबरीचे दोन अनुवाद होऊ नयेत असंही नाही. तरीही राहून गेलं हे मात्र खरं.
त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मला कारंतांचे विचार व्यक्त करणारं पुस्तक ('कारंत-चिंतन' हे मी दिलेलं नाव) अनुवादित करायला मिळाल्यामुळे ही खंत काहीशी कमी झाली आहे.
हा अनुवाद करायची मला संधी मिळाली नसली तरी, ती कादंबरी मराठीत उपलब्ध आहे; ही गोष्ट तरी बरी आहे. पण दुसरी खंत मात्र तशी नाही.
लोककथा हा माझ्या अतिशय आस्थेचा विषय आहे. आधुनिक कन्नड साहित्याचा अनुवाद करतानाही त्या मला वेळोवेळी भेटत असतात. अगदी छोटीशी लोककथाही खूप काही सांगून जाते. मराठी साहित्यात मला त्यांचा अभाव फार जाणवला. कन्नडमधला यावनूर महादेव यांच्यासारखा दलित लेखकही आपल्या कथा-कादंबऱ्यांत ती परंपरा सोडत नाही. तसंच तिथला नाटक हा कला-प्रकारही त्याभोवती अनेकदा फिरताना दिसतो. तो एकीकडे स्थानिक पातळीवर असतो तर, दुसरीकडे सार्वत्रिकही असतो. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या जिवंत संगीतामुळे जे चैतन्य रंगमंचावर उसळतं ते तर अद्भुत असतं. तिथली बी. जयश्ाीसारखी दिग्दशिर्का याचा प्रभावीपणे वापर करते. गिरीश कार्नाड आणि चंदशेखर कंबार यांच्यासारखे नाटककार एकच लोककथा ऐकून दोन-दोन प्रभावी नाटकं लिहितात... असो.
काही वर्षांपूवीर् डॉ. एम. एम. कुलबुगीर् यांच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कर्नाटकातल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या परिसरातल्या लोककथांचं संशोधन आणि संकलन केलं आहे. (इतरही कलांचं तिथं संशोधक-संकलन चालतं) डॉ. कलबुगीर् हे कन्नड भाषेला वाहिलेल्या हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू असल्यामुळे त्यांनी स्वत:च्या संग्रहातले या विषयावरचे ग्रंथ आम्हाला लगोलग काढून दिले. त्या वेळी मला वाटलं. माझ्याकडून तत्परतेनं या लोककथांची निवड होईल आणि एखाद्या नियतकालिकातून मी त्या नियमितपणे प्रकाशितही करू शकेन!
पण त्याच वेळी आम्हा दोघांच्याही हातात वेगवेगळी कामं येत राहिली. (विरूपाक्षही मराठी आणि इंग्लिशमधलं साहित्य कन्नडमध्ये अनुवादित करत असतात.) अजूनही तो ओघ कायम आहे आणि वयोपरत्वे तासन्तास काम करण्याबरोबर जास्तीचं वाचन काढण्यासाठी वेळही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे यानंतर हे काम राहूनच जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे.
तसं हे काम कायमचं राहून गेलं, तर मात्र मला हुरहूर वाटल्याशिवाय राहणार नाही!
पानिपतची लढाई म्हणजे मराठी माणसाच्या मनातली भळभळती जखमच. अशा विषयावर ऐतिहासिक कादंबरी लिहायचं तुम्हाला कसं सुचलं?
मुळात भाऊसाहेब कधीच ‘फडावरचा कारकून’ नव्हता. मराठय़ांचं तोफदळ प्रबळ व्हावं म्हणून फ्रेंचांकडून तोफा घेणं, फ्रेंचांचा सेनापती फोडून मराठा सैन्यात आणणं तसंच अनेक लढायांचा अनुभव त्याच्याकडे होता.
‘पानिपत’ हा विषय जेव्हा मला सुचला तेव्हा मला मौर्य काळातल्या ‘त्या’ अज्ञात शिल्पकारांच्या जमातीची याद आली. त्यांच्या कल्पनेत असलेली शिल्पं साकारण्यासाठी जेव्हा त्यांना अजंठा-वेरूळच्या डोंगरातला एकसंध दगड दिसला असेल तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल? पानिपतचा विषयही त्या अवाढव्य डोंगराइतकाच प्रचंड आहे. त्या इतिहासाच्या डोंगरातून जर चांगलं शिल्प कोरायचं असेल तर आपण आपली छिन्नी- लेखणी जबाबदारीने वापरायला हवी याचं मला पूर्ण भान होतं.
पानिपतच्या लढाईच्या काळाचा फील यावा यासाठी मी तत्कालीन अस्सल कागदपत्रं अभ्यासली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या दरम्यान पानिपतमधून महाराष्ट्राला व महाराष्ट्राकडून पानिपतला अशी हजारो पत्रं लिहिली गेली होती. सुदैवाने आजही ती उपलब्ध आहेत. या पत्रांमध्ये लढाईच्या वर्णनापासून ‘चिंगी गरोदर आहे’ इथपर्यंतची वर्णनं मिळाली. या पत्रांमुळे त्यावेळच्या चालीरीती, भाषा समजून घ्यायला खूपच मदत झाली. तोफेसाठी वापरला जाणारा ‘सुतरनाळ’ हा सुंदर मराठी शब्दही असाच समजला.
तेव्हा सह्याद्री पर्वताची सावली सोडून मराठेच दिल्लीच्या पातशाहीच्या संरक्षणासाठी लढायला गेले ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब नव्हे का? आपला ज्याने पराभव केला तो कुणी लेचापेचा सरदार नव्हता तर जगातला अत्यंत प्रबळ असा एक बादशहा होता हेसुद्धा आपण विसरून चालणार नाही. आपण लढाईत पराभूत होऊनही अजिंक्यच ठरलो असं माझं स्पष्ट मत आहे.
ग्वाल्हेरमध्ये, होळकरांनी इंदूरमध्ये तर गायकवाडांनी बडौद्यात आपापली राज्यं स्थापन केली. पानिपतच्या पराभवाची राख कपाळाला लावूनच ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उत्तर हिंदुस्तानात दिग्विजयी ठरले.
लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद प्रकल्प ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या १० कादंबऱ्यांचा संच २५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित होत आहे. नाटककार प्रा. मधुकर तोरडमल यांनी या कादंबऱ्यांचा अनुवाद केलेला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत..
कादंबऱ्यांचा संच २५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित होत आहे. ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांनी या कादंबऱ्यांचा अनुवाद केलेला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत..
पुष्कर दिवसभर ढोरमेहनत करीत होता, पण त्याला पोटापुरते उत्पन्नदेखील मिळत नव्हते. त्याची कमाई तुटपुंजी होती. आपले हे दरिद्री आयुष्य बघून तो नेहमी काळजींत असे. त्याला स्वतःची चीड यायची. एकदा एका विवाहसमारंभाच्या ठिकाणीं पुष्करला काम मिळाले. विहिरीचे पाणी रहाटाने काढायचे, मोठी पातेली घांसायची, हे काम होते. दिवसभर पाहुणे मंडळी येत होती. येणार्यांचे आगतस्वागत होत होते, स्वादिष्ट पक्वान्नांचे भोजन सर्वांसाठी तयार होत होते. जेवून जाणारा प्रत्येक पाहुणा जेवणाची स्तुती करून, तृप्त होऊनच जात होता. अधूनमधून पुष्करला खायला दिले जात होते. त्यामुळें त्याला सांगितलेली कामें तो मोठ्या उत्साहाने व मन लावून करत होता.
ती सर्व सुरम्य माहिती ऐकल्यानंतर पुष्करला आपले जीवन निरर्थक आहे असे वाटायला लागले. मोठा श्रीमंत माणूस होण्याची त्याला प्रबळ इच्छा झाली. कांहीही करून श्रीमंत व्हायचंच असे त्याने ठरवलं. गांवाबाहेर असलेल्या मठांत एक नवीन साधू आला होता. पुष्कर त्या साधूला जाऊन भेटला व त्याने आपले दुःख त्याला सांगितले.
‘‘मला वयापेक्षां सुख जास्ती महत्वाचे आहे. कारण एखाद्या कावळ्यासारखा उभा जन्म घालवण्यापेक्षां मला सहा महिने कां होईना, पण हंसासारखं ऐटींत जगता येईल.’’ पुष्करने निश्चयी स्वरांत उत्तर दिले. ‘‘बाह्यरूपावर जाऊन तू घाईगडबड करुं नकोस. या जगांत कावळ्याकडून आपल्याला काय मिळालं नाही आणि हंसाकडून काय मिळालंय याचा माणसाने पूर्णपणें विचार करुनच कोणताही निर्णय घ्यायला हवा.’’ असं म्हणून साधुने पुष्करला पुन्हां एकदा धोक्याची सूचना दिली.
वैद्यबुवा नेहमी तुला सांगत असतात कीं सातत्याने व्यायाम करत राहिल्याने जे कांही खायचं असेल ते तुम्ही खाऊं शकाल. पण तू तर एकदम आळशी आहेस. जरासा देखील पायी चालायला नाखूष असतोस. ही असली सुस्ती चांगली नाही.’’
रत्नपुर राज्यांतल्या वज्रपुर नांवाच्या खेड्यांत आदित्य हा तरुण राहात होता. तो खूप हुशार आणि चटपटीत होता. आपल्या आईवडिलांचा मान तो राखीत असे. त्यांची शेती लहानशी होती. त्यामुळें कष्टांचे जे फळ मिळायला हवे ते त्याला मिळत नव्हते. त्याचे वाडवडीलदेखील त्याच परिस्थितींतून गेलेले होते. वज्रपुरांत पाऊस वेळेवर पडला तर चांगले पीकपाणी होत होते. पण पाऊस चांगला पडला तरी चांगले पीक हाती लागेलच याची खात्री नसे. त्याचं कारण होतं. त्या गांवाजवळ असणारी बाष्पधारा नदी. ती नेहमी कोरडीच असे. तिला केव्हां पूर येईल ते सांगता येत नसे. उगमाजवळ जोरदार पाऊस पडला तर अचानक पूर येई आणि गांव आणि शेते जलमय होत असत.
दोन दिवस तो चालत राहिला. त्याला कुठे जायचं होतं आणि तो कोणत्या दिशेला जात होता हेदेखील त्याला ठाऊक नव्हतं. तिसर्या दिवशी एका वडाच्या झाडाखाली थोडी विश्रांति घेऊन जेव्हां तो तिथून निघाला, तेव्हां त्या झाडींत कांहीतरी चकाकत असल्याचा त्याला भास झाला. त्याने जवळ जाऊन ती वस्तू उचलून पाहिली. ते एक हिर्यांचे कंकण होते. त्याच्यावर राजमुद्रा होती. आदित्यने ते कंकण आपल्या कपड्यांत लपवले आणि तो मार्गस्थ झाला.
शशांकपुरांत आदित्य आणखी दोन दिवस थांबला आणि तिसर्या दिवशी तो राजसभेंत गेला. त्याने महाराजांना आदराने वंदन केले आणि भर सभेंत ते हिरेजडित सुंदर कंकण त्याने महाराजांच्यासमोर ठेवले.