Thursday, May 31, 2012

भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणारं रेलचक्र हे नवं सदर Relchakra railwaychakra book

भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणारं रेलचक्र हे नवं सदर

भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर मात्र रेल्वेने दुतगतीने प्रगती केली. ईस्ट इंडिया कंपनी व जीआयपीआर कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवून अन्य रेल्वे कंपन्या उभारण्यात आल्या. उदाहरणार्थ बॉम्बे बडोदा अॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे , मदास रेल्वे आणि अन्य अशा बेचाळीस कंपन्या उभारल्या गेल्या. या बहुसंख्य कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर त्यांची संख्या पंचवीसवर आली. त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1951 मध्ये पंचवीस कंपन्यांचं एकूण नऊ क्षेत्रीय रेल्वे मध्ये वगीर्करण करण्यात आलं ते असं.

मध्य रेल्वे , पश्चिम रेल्वे , दक्षिण रेल्वे , उत्तर रेल्वे , दक्षिण-मध्य रेल्वे , दक्षिण-पूर्व रेल्वे , उत्तर-पूर्व रेल्वे , पूर्व रेल्वे , पूर्वोत्तर सीमा रेल्वे.

त्यानंतर 1-4-2003 पासून सोयीच्या दृष्टीने व कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आणखीन पाच क्षेत्रीय रेल्वेची निमिर्ती करण्यात आली.

उत्तर-मध्य रेल्वे , उत्तर-पश्चिम रेल्वे , पश्चिम मध्य रेल्वे , दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे , दक्षिण-पश्चिम रेल्वे.

थोडक्यात म्हणजे आता संपूर्ण भारतीय रेल्वेही चौदा क्षेत्रीय रेल्वेने विभागली गेली आहे.

दीडशे वर्षांच्या भारतीय रेल्वेच्या वाटचालीतील काही महत्त्वाचे टप्पे.


*** पहिलं सीझन तिकीट मंुबईत 1854 मध्ये देण्यात आलं.

*** पहिली दुमजली गाडी 1862 साली निम्न वर्गाच्या डब्यासाठी चालवली गेली.

*** पहिला ऐष आरामी दालनयुक्त डबा , 1863 मध्ये मंुबईच्या गव्हर्नरसाठी बांधण्यात आला.

*** पहिला महत्त्वाचा तांत्रिक विकास होता व्हॅक्युम बेक. या आविष्काराचं कार्य- 1879 मध्ये सुरू झालं.

*** पहिली छोटीशी गाडी 1881 मध्ये दाजिर्लिंगला धावू लागली 1999 मध्ये. तिला युनेस्कोतफेर् हेरिटेज म्हणून जाहीर करण्यात आलं.

*** टॉयलेटची सोय पहिल्या वर्गात 1891 मध्ये तर निम्न वर्गात 1907 मध्ये प्रथम करण्यात आली.

*** डब्यामध्ये विजेचे दिवे प्रथम बसवण्याचा मान 1902 मध्ये जोधपूर रेल्वेने पटकावला. त्यानंतर 1903 मध्ये विजेवर चालणारे पंखेदेखील फिरू लागले.

*** रेल्वेमधील पहिलं भोजनालय 1904 मध्ये आलं.

*** पहिली इ.एम.यु (उपनगरीय गाडी) 3 फेब्रुवारी 1925 रोजी हार्बर मार्गावरून व्हिक्टोरिया टमिर्नस ते कुर्ला अशी धावली होती.

*** पहिल्या स्वयंचलित सिग्नलचं काम 1928 मध्ये सुरू झालं.

*** फ्रॅण्टियर मेलची सुरुवात सप्टेंबर 1928 मध्ये झाली. त्या वेळी ती सर्वात वेगवान गाडी होती.

*** गाडीला पहिला वातानुकूलित डबा 1936 मध्ये जीआयपी रेल्वेवर जोडण्यात आला होता.

*** पहिलं डिझेल इंजिन 1945 मध्ये धावलं.

*** मुंबई आणि दिल्ली यांना जोडणाऱ्या पहिल्या राजधानी एक्सप्रेसचं उद्घाटन 17 मे 1972 रोजी झालं. केवळ 19 तास 5 मिनिटाच्या अवधीत या गाडीने 1388 किलोमीटर अंतर पार केलं.

*** पहिल्या आणि एकमेव राष्ट्रीय रेल्वे म्युझियमचं उद्घाटन 1977 मध्ये नवी दिल्लीत झालं.

*** पहिली कम्प्युटरकृत आरक्षण व्यवस्था 1986 मध्ये नवी दिल्ली इथे सुरू झाली.

*** जगातली पहिली लाइफलाइन एक्सप्रेस (धावते रुग्णालय) 1991 मध्ये व्हीटीइथून धावली.

*** उपनगरी रेल्वेत महिलांसाठी पहिली खास गाडी पश्चिम रेल्वेने 4 मे 1992 रोजी सुरू केली.

*** क्रेडिट कार्डवर तिकीट देणारं पहिलं स्थानक ठरलं दिल्ली. ही सुविधा सप्टेंबर 1997 मध्ये सुरू झाली.

*** फेअरी क्वीन-पऱ्यांची राणी हे 145 वर्षं जुनं इंजिन जगातलं सर्वात जुनं कार्यरत इंजिन असल्याचं प्रमाणपत्र गिनिज बुक ऑफ र्वल्ड रेकार्डने दिलं.

*** नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ताशी 140 किमी हा कमाल वेग गाठणारी आज भारतातील सर्वात वेगवान गाडी आहे.

*** भारतीय रेल्वेवरचा सर्वात दीर्घ मार्ग कन्याकुमारी ते जम्मुतावी आहे व हे 3751 किमीचं अंतर पार करायला हिमसागर एक्सप्रेसला 72 तास 55 मिनिटं लागतात.

*** जगातला सर्वात लांब फलाट खरगपूरला आहे. त्याची लांबी 833.56 मीटर आहे.

*** भारतात सर्वात जास्त काळ सुरू राहिलेलं डीसी , इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह ' सर लेस्ली विल्सन ' हे होतं.

*** भारतीय रेल्वेवरचा सर्वात लांब पूल राजमुंदीजवळ गोदावरी नदीवर आहे. त्यांचीलांबी 5 किमी पेक्षा जास्त आहे.

*** पहिली जनशताब्दी (मुंबई-मडगाव) 16 एप्रिल 2002 मध्ये धावली.

आज एकाच व्यवस्थापना खाली असणारं रेल्वेचं जाळं आशियात सर्वात मोठं व जगात दुसऱ्या क्रमांकाचं आहे. भारतीय रेल्वेत काम करणारा 16.5 लाख कर्मचारी वर्गसुध्दा जगात सर्वात जास्त आहे.

16 एप्रिल 1853 साली रेल्वेत फक्त चौदा डबे व तीन वाफेची इंजिनं होती तर आज दीडशे वर्षांनंतर भारतीय रेल्वेकडे 39,236 प्रवासी वाहतुकीचे डबे , 2,16,717 माल वाहतुकीचे डबे , 63,140 कि.मी. रेल्वे मार्गाची लांबी व एकूण रेल्वे स्थानकाची संख्या 6,856 आणि एकूण इंजिनाची संख्या 7,739 एवढी आहे. या शिवाय ऐंशी टक्के रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालेलं आहे. बऱ्याच एकपदरी मार्गाचं व्दिपदरी रेल्वे मार्गात रूपांतर केलेलं आहे. अशा या भारतीय रेल्वेनं राजापासून प्रजेपर्यंत , नेत्यापासून अनुयायापर्यंत , उच्चासनाच्या श्ाेष्ठीपासून सामान्यापर्यंत प्रत्येकाची आशा आकांक्षाची पूर्तता करण्यात मोलाचा हातभार लावला आहे. या देशाच्या आथिर्क , सामाजिक , सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान प्रगतीला भारतीय रेल्वेने वेग दिला आहे. युरोप आणि अमेरिकेत रेल्वे व्यवस्था सुरू झाली ती त्या-त्या देशाच्या औद्योगिक क्रांतीतून उद्भवलेल्या वाहतूक विषयक समस्यांवर उत्तर शोधण्याच्या आवश्यकतेतून. या उलट भारतात औद्योगिक क्रांतीचा पायाच रेल्वे परिवहन व्यवस्थेने घातला आहे.


- व्यंकटेश बोर्गीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive